Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ जुलै, २०२५
शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे रणकंदन! शिरपूरात टायर जाळून 'चक्का जाम' आंदोलन
शिरपूर (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक होत रस्त्यावर उतरून गुरुवारी शिरपूर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार चक्का जाम आंदोलन करीत सरकारला श थेट इशारा दिला. टायर जाळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शिरपूर येथे देखिल सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा", "दिव्यांगांच्या समस्या सोडवा", अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला. बच्चू कडूंनी याआधी विदर्भात पदयात्रा काढून कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. आता सरकारला घेरण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून थेट संघर्षाचा मार्ग अवलंबला आहे.
शिरपूरमधील आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत, मोहन पाटील, शिरपूर फास्ट संघटनेचे हंसराज चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सरोज पाटील, काँग्रेसचे मनोहर पाटील, कॉ. शिवाजी बोरसे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे भरतसिंह राजपूत, दिव्यांग संघटनेचे महेंद्र पाटील, नितीन जाधव, विजय कोळी,आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. स्थानिक पोलीस अधिकारी आंदोलकांशी समन्वय ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसले.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर आठ महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कर्ज कायम आहे. कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच दिव्यांगांना अपेक्षित सवलती व सेवांचा लाभ मिळत नाही.दिव्यांग बांधव विकासापासून वंचित आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रहारने एक आक्रमक चळवळ उभी केली असून सातत्याने संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनात दिव्यांगांना लाभ मिळावा अशी मागणी करण्यात आली. यासह अनेक मुद्द्यांवर प्रहार संघटनेने सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा