Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५
Home
/
Unlabelled
/
बेटावद येथे मिरची पिकावर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी शेतकरी मनोज माळी यांचे मोठे नुकसान
बेटावद येथे मिरची पिकावर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारणी शेतकरी मनोज माळी यांचे मोठे नुकसान
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू माळी यांच्या शेतात लावलेले सुमारे दोन एकरांवरील दीड महिन्याचे मिरचीचे उभे पीक अज्ञात इसमाने तणनाशकाची फवारणी करून पूर्णपणे जाळले.
या कृत्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, मेहनतीने उभे केलेले पीक काही तासांत उद्ध्वस्त झाले. दीड महिन्यापासून मनोज माळी यांनी मिरची पिकाची मशागत, सिंचन व देखभाल करून पीक जोपासले होते. परंतु, अज्ञात व्यक्तीच्या दुर्दैवी व बेकायदेशीर कृतीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी व गावकरी मोठ्या संख्येने शेतात जमले. सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. शेतकरी मनोज दोधू माळी यांनी या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्याची मागणी केली असून, संबंधित दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांवर अशी विध्वंसक कृत्ये होत राहिल्यास शेती करणे धोकादायक ठरेल, असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने भरपाई द्यावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
कोपरगाव प्रतिनिधी:- मा.राजेश देशमुख साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा