Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील शाळेत नियमांना हरताळ? लाचलुचपत प्रकरणातील आरोपी पुन्हा सेवेत कसे?
शिरपूर तालुक्यातील शाळेत नियमांना हरताळ? लाचलुचपत प्रकरणातील आरोपी पुन्हा सेवेत कसे?
शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील एका शाळेवर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत अटक झालेले व सध्या जामिनावर असलेले आरोपी त्याच संस्थेत पुन्हा रुजू कसे केले गेले? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबन व विभागीय चौकशी अपेक्षित असताना, संस्थेने कोणत्या नियमांच्या आधारे त्यांना सेवेत कायम ठेवले, हे अद्याप अस्पष्ट आहे.
विशेष म्हणजे आरोपी व तक्रारदार एकाच आस्थापनेत कार्यरत असल्याने तक्रारदारावर दबाव येण्याची, साक्षीत हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब नैसर्गिक न्याय, शालेय आचारसंहिता आणि प्रशासकीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणात शिक्षण विभाग, संस्थाचालकांची भूमिका आणि संबंधित प्राधिकरणांची निष्क्रियता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांकडून दोषींवर तात्काळ कारवाई, आरोपींचे निलंबन आणि स्वतंत्र चौकशीची मागणी होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा