Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६
बिर्याणी खाऊ घातली नाही म्हणून तीक्ष्ण हत्याराने वार
अमळनेर:- बिर्याणी खाऊ
घातली नाही म्हणून राग येऊन एकाने तीक्ष्ण हत्याराने डोळ्याच्या भुवयीवर वार केल्याची घटना ८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फरशी पुलावर घडली.
कार्तिक दिनेश धाप वय १६ रा कोष्टीवाडा हा फरशी पुलावर शिवशक्ती दुकानावर सोयाबीन बिर्याणी खायला गेला असताना त्याठिकाणी कृष्णा उर्फ अंडापाव बिऱ्हाडे हा बसलेला होता. त्याने कार्तिक ला संगितले की मला बिर्याणी खाऊ घाल. कार्तिकने पैसे नाहीत मी नंतर खाऊ घालेल असे सांगताच त्याला राग येऊन त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली आणि त्यांनतर हातातील तीक्ष्ण हत्याराने डाव्या डोळ्याच्या भुवयीवर वार केला. मित्रांनी भांडण आवरले. कार्तिकने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कृष्णा उर्फ अंडा पाव विरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), ११५(२) ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा