Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १४ मे, २०२६

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मोठया उत्साहात साजरी.


माधव खाबिया :-
मेहकर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीपभाऊ गवई आपल्या छोट्याखानी भाषनातुन म्हणाले की, शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी भोंसले यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती संभाजी महाराज हे औरंगजेबाचे सर्वात शक्तिशाली प्रतिस्पर्धी होते. त्याने मुघल साम्राज्यातील दोन महत्त्वाचे किल्ले, विजापूर आणि गोलकोंडा आपल्या स्नायूंच्या बळावर हल्ला करून काबीज केले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आपले नाव भारताच्या इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. संभाजी महाराजांच्या जन्म स्थळावर एका सुंदर देवळाची निर्मिती झाली आहे. त्याच्या जन्मस्थळावर आजही भक्त प्रदक्षिणा करतात. संभाजी महाराजांचा वध किल्ल्याच्या एका कुळगुरुच्या चळवळीतून झाला होता त्यांना वाचविण्यासाठी सर्व मावळ्यांनी आणी रायप्पा महार यांनी लाखो मुगघ सैनिकांच्या छावणीत घसुन राजेना वाचविण्याचा प्रयत्न केला पण तो अ यशस्वी ठरला. राज्याच्या अनेक अस्तित्वावर धडकणारे असे थोर छत्रपती संभाजी महाराज त्यांची आज जयंती त्यांच्या कार्याची व विचाराची जाणीव करुन घेणे हि काळाची गरज आहे. असे विचार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध