Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २२ जुलै, २०१९

रस्ता पावसामुळे खचला. मोठा अपघात होण्याची दाट शक्यता. गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला जाग येइल का ?संतप्त प्रवाशांचा सवाल..

 

प्रतिनिधी (संदीप सैदाणे)अमळनेर ते करणखेडे डांबरीकरण केलेला अमळनेर ते करणखेडा रस्ता प्रदिर्घ कालावधीनंतर दिड वर्षांपुर्वी बनला.रस्त्याच्या आश्वासनावर अनेक आमदार पडले आणि 



निवडले.कृषीभुषण साहेबराव दादांच्या सरत्या कार्यकाळात बोरी काठ परीसराला  रस्ता एकदाचा बनला.परंतु पावसाच्या पाण्याला(सांडव्याला) नैसर्गिक उतारावर व्यवस्था न केल्यामुळे अंबारे गावालगत रस्ता खचला व मोठे भगदाड पडून रस्ता जायबंद 

झाला.प्रशासनाने,लोकप्रतिनिधिंनी,सार्वजनिक बांधकाम विभाग व सबंधितांनी त्वरित लक्ष न दिल्यास मोठा अपघात,अनर्थ होऊ शकतो याची नोंद घ्यावी .तो रस्ता जलदगतिने रहदारीयोग्य करावा अशी नागरिकांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध