Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १७ जुलै, २०१९

कृषिदुतांनी साधला जेष्ठ नागरिकांसोबत संवाद




 प्रतिनिधी :(निखिल राजपूत)नारायणगाव,   ता. जुन्नर दि16जुलै2019
गुंजाळवाडी परीसरात कृषी महविद्यालय,पुणे येथील कृषिदूतांनी गुरु पौर्णिमेच्या औचित्य साधून गुंजाळवाडी परिसरातील शेतकरी तसेच जेष्ठ नागरिकांसोबत पारंपारिक शेती तसेच पारंपारीक लोकजीवन , सेंद्रिय शेती 

,आधुनिक शेती पद्धती त्याचे परिणाम ,तसेंच गावातील विविध समस्यावर चर्चा केली, यावेळी कृषिदूतांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहीती दिली, तसेच यावेळी जेष्ठ नागरिक प्रश्न मंजूषा घेण्यात आली , नागरिकांनीही उत्स्फुर्त सहभाग नोंदवला यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.एन.वाघमारे सर , कृषी 

महविद्यालय,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली कृषिदूत सौरव पाटील, शुभम पोफळे, निखिल राजपूत, राजेश राऊत, बद्रीनाथ साबळे, महेश शिंदे (कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले व विषयानुसार मार्गदर्शन केले, तसेच यावेळीं शेतकरीं , तसेंच महीला, जेष्ठ नागरिक यांचा उत्स्फूत सहभाग होता . कार्यक्रमाचा शेवट 

पसायदान व आभारप्रदर्शनाने केला यापुढेही कृषिदुत गूंजाळवाडी गावात विविध उपक्रम राबवणार आहेत, यांत ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध