Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ ऑगस्ट, २०१९

शिरपुरात भाजपा तर्फे जम्मु काश्मीर मुक्तता बद्दल जल्लोष






प्रतिनिधी शिरपुर  जम्मु काश्मीर मधून 370 कलम केंद्र सरकारने  हटवल्या बद्दल शिरपुरात भाजपा तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. येथील भाजपा कार्यलय ते विजय स्तंभ मार्गे भवानी मंदीर, पातेश्वर मंदीर, कापड बाजार यामार्गे मिरवणूक काढण्यात आली वाजंत्री वाजत 

आतिषबाजी करुन पेढे वाटण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी देशाच्या प्रधानमंत्री मा नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री मा अमितजी शाह चे अभिनंदन  केले. व उपस्थित कार्यकर्तेंना मार्गदर्शन केले. जल्लोष प्रसंगी येथील हुतात्मा स्मारकवर पुष्पांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, मिलिंद पाटील, जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, चंद्रकिंत पाटील जिल्हा 

कोषाध्यक्ष आबा धाकड, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका सरचिटणीस दिपक ठाकुर, देवेंद्र देशमुख, उपाध्यक्ष सुरेंद्र राजपुत, किमोर राजपुत, चिटणीस किशोर कोळी, विजय पाटील, शहर सरचिटणीस रोहित शेटे, उपाध्यक्ष मुकेश पाटील, राहुल देवरे, चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, रहिम खाटीक, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा 

सरचिटणीस मुबीन शेख, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, 
शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर बोरसे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपुत, शहराध्यक्ष विक्की चौधरी, रविंद्र सोनार, भटु माळी, डाॅ. मनोज महाजन, राहुल ईशी, मधुकर पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध