Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

कोल्हापूर व सांगली जिल्यातील पूरपरिस्थिती भयावह,,, राजेंद्र पाटील ,तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस,,,





चोपडा ,(प्रतिनिधी) विनोद निकम
कोल्हापुर व सांगली जिल्हा येथील पुरग्रस्त नागरिकांना चोपडा येथून 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेऊन तेथे जाऊन मदत करून परत आले,तेव्हा राजेंद्र  पाटील यांनी सांगितले की तेथील घरात एकहि वस्तु शिल्लक नाही,सर्व महापुरात वाहून 

गेले,काहि लोकांचा अजूनही पत्ता लागला नाही,आणि सायकल पासून ते इंनोवा 4चाकी गाड्या ही वाहून गेल्या,कोणतीही वस्तु शिल्लक नाही,गुर,ढोर, सर्वच पाण्यात वाहून फुगुन मेली, जिकडे तिकडे आता फक्त दुर्गंधि पसरली आहे,आणि ह्या लोकांचे पुनर्वसन कसे होईल,आज छोट्या मोठ्या प्रमाणात किरकोळ  मदत मिळते आहे,पण पुन्हा महीन्यानन्तर काय कोन मदत देणार,भयानक परिस्थिति 

आहे,अक्षरशः तेथील लोकांची दयनीय परिस्थिति पाहून क्रूर माणसाच्या ही डोळ्यातुन अश्रु येतील,नियतीने असे, कोनासोबत ही एवढे वाईट करू नए,अस सर्व म्हणत आहेत,





चोपड़ा येथून माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,यांच्या मार्गदर्शनाने चोपड़ा येथून कपड़े,साड़ी चोळी आणि लहान मुलाना शालेय दप्तर,आणि चादरी आणि मेडिसिन घेऊन चोपड़ा येथून डॉ, पवन पाटिल,डॉ, विजय पाटिल, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र पाटिल यांच्यासह गांवमाझा चे पत्रकार मिलिंद सोनवणे, यांनी चोपड़ा येथून जाऊन 

सांगली,कोल्हापुर,डीग्रस आणि धमाने या गावी जाऊन आरोग्य सेवा दिली,आणि चेकअप करुंन औषधि वाटप केलि,धमाने या गांवातुन आम्ही परत येत असताना त्यांच्या डोळ्यातुन अश्रु येत होते,तुम्ही एवढ्या लांब येऊन आम्हाला मदत केली, अशी माहिती राजेंद्र पाटील व मिलिंद सोनवणे यांनी दिली,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध