Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

आर्वी येथील शेतकऱ्यांना हुमनी आळी बंदोबस्ता बाबत मार्गदर्शन*




प्रतिनिधी निखिल राजपूत:आर्वी - येथील डोंगरे मळ्यात, 'ग्रामीण कृषि कार्यानुभव' कार्यक्रमा अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथून आलेल्या कृषिदूतांनी, या भागातील ऊस शेतकऱ्यांसमोर हुमनी आळी या महत्वाच्या ऊस-किडी बाबतीत मार्गदर्शन केले. हुमनी आळी ऊसाच्या मुळ्यांना पोखरून मुळे ठिसूळ करून ऊसाचे १० -१५ % नुकसान करते. पावसाळ्याच्या सुरूवातीला या आळीचे भुंगेरे तयार होऊन त्यांचे प्रजनन होते. या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी, कृषिदूतांनी शेतकऱ्यांना 'लाईट ट्रॅप' बनविण्याचे सुचवले. पावसाळ्यात, जमिनीतून रात्रीच्या वेळी बाहेर येणारे हे भुंगेरे, 'लाईट ट्रॅप' कडे आकर्षित होऊन त्याखाली असलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात व त्यामुळे शेतातील हुमणी आळीचे प्रमाण कमी होते तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही टळते. शिवाय हा ट्रॅप बनवायला अगदी सोप्पा व परवडणारा असल्याचेही कृषिदूतांनी सांगितले.
यावेळी शुभम करपे, आकाश साबळे, ऋषीकेश काळे, राघव रेड्डी व गौरव पाटील या कृषि दूतांनी मार्गदर्शन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध