Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

भटक्या-विमुक्तांचा उद्या मुंबईत मेळावा


राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने भटक्या-विमुक्तांचा रौप्यमहोत्सवी मेळावा, उद्या, रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात १९९६ सालापासून होणाऱ्या मेळाव्याचे यंदा २५ वे वर्ष आहे.

प्रतिनिधी:नागपूर:राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्यावतीने भटक्या-विमुक्तांचा रौप्यमहोत्सवी मेळावा, उद्या, रविवारी मुंबईच्या आझाद मैदानात आयोजित करण्यात आला आहे. 
आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात १९९६ सालापासून होणाऱ्या मेळाव्याचे यंदा २५ वे वर्ष आहे.

मेळाव्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या विविध भागात भटके, विमुक्त समाजासाठी काम करणारे नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यात सहभागी होतील. ठाणे येथील दलाचे जिल्हाध्यक्ष प्रभू चव्हाण कर्नाटकमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. यानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. संत सेवालाल सेना, बंजारा टायगर, ओबीसी ब्रिगेड, सत्यशोधक समाज, बारा बलुतेदार महासंघ, आदिवासी गोवारी संघटना, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल, भारतीय कामगार शेतकरी संघटना, अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनांचे मेळाव्यास सहकार्य लाभले आहे.

अशा आहेत मागण्या...

नोकरभरतीसाठी असलेले महापोर्टल बंद करून, राज्य लोकसेवा आयोगाप्रमाणे स्पर्धा परीक्षा घ्याव्या.
कुठलीही अट न लावता सरसकट कर्जमाफी द्यावी.

शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी.

भटक्या भोई जमातीच्या वाडे तथा  गावठाणचा विकास सरकारच्या आर्थिक मदतीने व्हावा

भोई मच्छीमार बांधवांना त्यांच्या परिसरात असलेल्या तलावपातळीवर मच्छीमारी हक्क मिळण्याची सरकारने योजना करावी

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, बढतीमध्ये आरक्षण लागू करावे.

क्रिमीलेअरमधून भटक्या विमुक्त, बारा बलुतेदारांना वगळावे.

भटक्या विमुक्त व ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.
बंजारा तांड्याला महसुली दर्जा द्यावा.
वसंतराव नाईक विकास महामंडळाला भरीव निधी द्यावा.

भटक्या विमुक्त समाजाला केंद्रात आरक्षणासाठी तिसरी सूची तयार करावी.
बारा बलुतेदार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.

२ टिप्पण्या:

  1. मि अर्जुन कचरे रा. धुुुनकवाड नं 2 ता.धारूर जिल्हा बीड राज्य महाराष्ट्र मी अतिशय गरिब कुटुंबातल मुलगा मी एक कहारभोई समाजातील मुलगा आथिर्क परिस्थिति बिकट असल्यामुले शिक्षण सोडले मी शासनास सांगू विछितो की कहारभोई समाज मच्छिमारी करून उदाहरनिरवा करत आहे तलावच्या कडेला आपली घरे व कोपटया बांधून राहतो आथिर्क परिस्थिती पडताळणी करून आरक्षण व घरकुल योजना राबविण्यात यावे व तलाव ठेका स्थानिक मच्छिमार यांना देण्यात यावे ही शासनास विनंती आहे व ठेकेदार स्थानिक मच्छिमाराची फसवणूक करतात म्हणून ठेकेदारावर कडक कारवाई करावी ही शासनास विनंती आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. कहार-भोई समाज ह्या समाजाची आथिर्क परिस्थिती ही अतिशय बिकट आहे हा समाज शिक्षणापासून व आरक्षणापासू वंचित आहे व ठेकेदार स्थानिक मच्छिमारांंची व सभासदांची फसवणूक करतात व मच्छिमारांंची पकडले मासे कमी भावात गुंडगिरी करुन घेतात व नाही दिल्यास कोठे गुन्हेे दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येते व या समाजातील मुलाबाळांच शिक्षण सुद्धा होत नाही म्हणून फसवणूक करणाऱ्या ठेकेदारवर व चेअरमनावर कडक कारवाई करण्यात यावी ही शासनास विनंती आहे.

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध