Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ जानेवारी, २०२०

सावित्रीबाई फुले यांना भोई समाजातील कवयित्री सौ अल्काताई घाटे यांनी आपल्या शब्दातुन नम्रतापुर्वक अभिवादन केले.


मुंबई प्रतिनिधी:- राज्यातील भोई समाजातील समाजसेविका, कवयित्री सौ अल्काताई घाटे यांनी सावित्रीबाई फुले यांना आज अभिवादन करतांना म्हटले की, आम्हाला समाजपातळीवर सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची सतत प्रचिती येत असते. 
त्यांची एक लेक म्हणून त्या पुन्हा लेखन करतात की, जगाने नाकारलेल्या लेकराला सावित्रीबाई फुले यांनी आपल्या मांडीवर बसवुन त्यांस मुळाक्षरे गिरवुन घेत असतांनाचे क्षण किती रम्य असतील... मग त्याच लेकरांच्या पिढीने सावित्रीबाई फुले यांना माई म्हणून आभाळाची उपमा दिली यातच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची पोहोचपावती आहे. सौ अल्काताई घाटे महाराष्ट्रातील संपुर्ण मच्छीमार बांधवांमार्फत नम्रतापुर्वक सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध