Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ४ जानेवारी, २०२०
शिवसेनेला पहिला धक्का; अब्दुल सत्तार यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे
मुंबई:प्रतिनिधी:मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाचच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
अब्दुल सत्तार मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच नाराज असल्याचं सांगण्यात येत होतं. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांना राज्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं. त्यामुळे अनुभव आणि राजकीय कारकिर्द मोठी असूनही दुय्यम दर्जा दिल्याबद्दल सत्तार अस्वस्थ होते. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्ता काँग्रेसच्या हाती देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याने सत्तार आणखीनच अस्वस्थ झाले होते.
त्यामुळे त्यांनी आज राज्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे सहा आमदार आहेत. काँग्रेसचा एकही आमदार नाही. जिल्हापरिषदेत शिवसेनेचे १८ सदस्य आहेत.
तर काँग्रेसचे जिल्हा परिषदेत अवघे सहा सदस्य असताना काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. हा निर्णय घेताना शिवसेनेने सत्तार यांना विश्वासात घेतलं नव्हतं. त्यामुळे सत्तार नाराज होते. हे सुद्धा त्यांच्या राजीनाम्या मागचं कारण असू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं. शिवाय जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असतात. मला विचारात घेत नाहीत. ज्या पक्षातून आलो. त्याच पक्षाच्या लोकांना पायघड्या अंथरल्या जात असतील तर मंत्रिपदी राहण्यात काय उपयोग? असा सवाल सत्तार यांनी केल्याचं सांगण्यात येतं.
अजित पवारांना अर्थ; आदित्य ठाकरेंकडे पर्यावरणाची जबाबदारी?
मनधरणी सुरू
दरम्यान, शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे औरंगाबादला पोहोचले असून त्यांनी सत्तार यांची मनधरणी सुरू केली आहे. सत्तार यांच्या नाराजीचं कारण समजावून घेऊन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. तर सत्तार यांनी राजीनामा का दिला हे मला माहीत नाही.
नाराजी असेल तर सत्तार यांनी स्वत: बोललं पाहिजे. कारण सांगितलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते दीपक सावंत यांच्या नाराजीवरही भाष्य केलं. दीपक सावंत मला काही दिवसांपूर्वी भेटले होते. पक्षात नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांची नाराजी मी उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे. त्यातून काही मार्ग निघेल, असं राऊत म्हणाले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी (प्रतिनिधी): वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मटका व्यवसाय पुन्हा डोके वर काढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. वणी श...
-
🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 धुळे जिल्ह्यातील कथित बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नवे दावे! प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा