Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ जानेवारी, २०२०

सिंचन घोटाळ्यातील सत्य जनतेसमोर आलंच पाहिजे :राजू शेट्टी


कोल्हापूर प्रतिनिधी:सिंचन घोटाळ्यात नेमकं काय झालं? याचं सत्य बाहेर आलंच पाहिजे. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही याबद्दल आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, एवढ्या मोठ्याप्रमाणावर सिंचनावर पैसा खर्च होऊन देखील, जर सिंचन वाढलेलं नसेल, तर नेमकं पाणी कुठतरी मुरतं आहे.
पैसा कुठंतरी मुरलेलाच आहे आणि म्हणूनच हे सत्य जनतेला कळालं पाहिजे, हा जनतेचा अधिकार आहे. कारण, शेवटी तो करदात्यांचा पैसा आहे. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर सांगितले आहे.

आज शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर ज्या आत्महत्या होत आहेत, त्याला सिंचनाचा अभाव हे देखील एक कारण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवनमरणाचा प्रश्न असल्याने, हा प्रश्न केवळ राजकीय असता कामा नये.या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन जे सत्य आहे, जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर आलाच पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

कर्जमाफीचे निकष बदलण्याची गरज 
सध्या जी काही दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे व त्याला जे काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषामध्ये सहा ते सात हजार कोटींच्यावर रक्कम जात नाही. एकतर आकडा चुकीचा आहे किंवा मग तुमच्याकडे ३१ हजार कोटी खर्च करण्याची तयारी असेल, तर हे निकष बदलावे लागतील, असं देखील राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध