Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांचे विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन


प्रतिनिधी:अमळनेर:मंगळवारी खान्देश एक्सप्रेस दररोज सुरू करण्याबाबत आमदार अनिल पाटील यांचे विधानसभाअध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून याबाबत गुरुवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पश्चिम रेल्वेचे व मध्य रेल्वेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

खान्देश एक्स्प्रेस वेळापत्रकानुसार खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनल ते भुसावळ जंक्शन पर्यंत मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सुटते तसेच भुसावळ जंक्शन ते वांद्रे टर्मिनस येथूनही मंगळवार, गुरुवार व शनिवार याप्रमाणे तीन दिवस सुटते, याबाबत माझ्याकडे जळगाव, धुळे तसेच नंदुरबार जिल्हयातून अनेक प्रवाशांनी मागणी केलेली आहे. 

खान्देश एक्सप्रेस ही वांद्रे टर्मिनस व भुसावळ जंक्शन येथून दररोज सुटावी जेणेकरुन सर्व सामान्य प्रवाशांना तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्हयामधून (खान्देशातून) आमदार व खासदार सुध्दा या रेल्वेने प्रवास करतात यासाठी खान्देश एक्सप्रेस भुसावळ जंक्शन व वांद्रे टर्मिनस येथून दररोज सुटावी. जेणेकरुन सर्वसामान्य प्रवाशांना व आमदार,खासदार यांनाही या रेल्वेने येण्या जाण्यासाठी सोय उपलब्ध होईल.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध