Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०२०

औरंगाबाद येथे जास्तीत जास्त भोई आणि त्याच्या तत्सम जमातीतील तरुणांनी सहभागी व्हावे. श्री अर्जुनभोई मुंबई



मुंबई: प्रतिनिधी:औरंगाबाद जिल्हा कार्यकारणीच्या संयुक्त विद्यमानाने भोई समाज आणि त्याच्या तत्सम जमातीतील अनेक समाज संघटना ज्या आपआपल्या परिने राज्यात समाजहितासाठी समाजप्रबोधन करत आहेत आणि त्या एकाच ठिकाणी आपल्या विचार कृतीतून आपल्या समाज हक्कासाठी १६ फेब्रुवारी २०२०रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र,औरंगाबाद येथे एकत्र होत आहेत या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष समाजसेवक मा गजानन दादा साटोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष मच्छीमार नेते तथा समाजसेवक मा प्रकाश लोणारे, कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक मा गजाननजी बावणे करतील. 

या कार्यक्रमात राज्यातील अनेक विभागातुन मान्यवर समाजघटक एकत्र होत आहेत त्यात अर्जुन के भोई एसए भोई जयंतराव शिर्के चंद्रकांतजी नलावडे प्रा एकनाथराव काटकर राजेंद्र महाडीक गणेशराव मोरे दादाराव आळणे तुकाराम वानखेडे आर आर जाधव उकंडराव सोनवणे गणेश सपकाळ राजेंद्र तमखाने अभिषेक घटमाळ हिरामण मोरे ज्ञानेश्वर खैरमोडे कमलेश लांडगे केके सुकासे नानासाहेब लकारे अँडव्होकेट शंकरराव वानखेडे डॉ अरविंद तुंबारे, जयसिंगजी गहरे अशोकजी मल्लाव दादाराव मल्लाव चंदुलाल परदेशी संजय केवट दिलीप परसाने गणेश वानखेडे अल्काताई घाटे यशश्री पाटील-भोई उज्ज्वला वाघवले .... इत्यादीसह अनेक समाजसेवक आपली हजेरी लावणार आहेत आणि महाराष्ट्रात सामाजिक एकरुपता का महत्त्वाची? यावर विचार मंथन करणार असल्याने या ऐतिहासिक समाजसंघटन एकता परिषदेला राज्यातील जास्तीत जास्त तरुण वर्गातील समाजसेवकांनी हजर राहुन आपल्या मनातील समाज पातळीवरील किंतु परंतुचा उलगडा मान्यवरांकडून करुन घ्यावा असे आवाहन समाजसेवक अर्जुनभोई यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध