Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २३ मार्च, २०२०
चोपड्या शहरातील नागरिक सामजिक भान विसरले,कलम १४४ ला नागरिकांचा ठेंगा,
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम
काल जनता कर्फ्यु दरम्यान चोपडयातील नागरिकांनी दाखवलेले सामजिक भान राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर चोपडा शहरात मात्र सकाळच्या सत्रात सामजिक भान विसरत कुठल्याच प्रकारचे गांभीर्य नागरिकांना दिसून आले नाही. सकाळी ९ वाजेच्यासुमारास शहरातील तहसील काचेरीजवळ, आझाद चौक,शिवाजी महाराज चौक ,मेनरोड येथे भाजीपाला ,दूध ,किराणा घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या दरम्यान नागरिक कोरोना वायरस संबंधी कुठलंही फिकीर दिसत नव्हती . मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या धारा १४४ चा कुठलाही धाक दिसत नव्हता.
चौकाचौकात जमलेली गर्दी पाहून चोपडा नगरपालिकेचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांनी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्या सह रस्त्यावर उतरत हातगाडीधारकाना हाकलून लावत पुन्हा हातगाडी लावू नये असे सांगत कारवाई करण्याची तंबी दिली.दरम्यान मेन रोडवर देखील काही दुकाने उघडण्यात आली होती ती देखील पुन्हा बंद करण्यात आलीत.तर पोलीस देखील या दरम्यान नागरिकांना पुन्हा घरातच राहण्याचे सांगताना दिसून आले.
काही भागात नागरिकाना अनेक वेळा सांगून देखील प्रशासनाला दाद देत नसल्याचे चित्र होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा