Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ मार्च, २०२०

कुरखळी गावात १७ नागरिकांची नोदणी करून तपासणी करण्यात आली.


कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे 
कुरखळी परिसरातील मुबंई, पुणे, नाशिक अशा विविध शहरांमधून नोकरी किंवा काही कामधंदा निमित्ताने बाहेरगावी गेलेले लोक आता गावाकडे परत येत असल्याने ग्रामस्थ व घरच्या लोकांनी दवाखान्यात जाण्यास प्राधान्य देत असून गेल्या चार दिवसांपासून नोदीं घेणे सुरू झाले आहे. 

आज पर्यत जवळपास १७ लोकांची नोदंनी करुन प्राथमिक तपासणी केली. सॅनेटाईझर ने हात धुतले व त्यांना स्वच्छता घेणे बाबत मार्गदर्शन केलं सोबत मास्कचे वाटप केले. याच बरोबर वैधकीय अधिकारी मनोज पाटील यांनी होम क्वारंटाईन चा स्टॅम्प करून घरी बसण्याचा सल्ला दिला असून घरीच गोळ्या औषधे घेवुन घरीचं थांबा इतत्र फिरु नका. 

कोरोना व्हायरसाच्या संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेता. सद्या आपल्या खान्देशात लग्नसमारंभाचे दिवस आहेत व त्यासाठी मुंबई, पुण्याकडचे पाहूणे येतील म्हणून खबरदारीचा ऊपाय म्हणून मास्क किंवा रूमालचा वापर करा, हस्तांदोलन टाळा, हात स्वच्छ धुवून जेवण करा, गर्दीकरून किंवा समुहाने थांबू नका. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास जानवू लागल्यास त्वरित दवाखान्यात जा. गावातील डॉ अमोल मोरे यांनी देखील गावात स्पिरिटचा उपयोगाने रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी करतांना स्वतः व रुग्णांना देखील हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देतात, सोबत त्यांनी उपाय म्हणून गल्ली बोळात घराबाहेर दिसणाऱ्या नागरिकांना स्पिरिटने हाताला व स्पर्श केला वस्तूला देखील स्पिरिटने स्वछ करतात.
ग्रामपंचायत कुरखळी च्या वतीन गावात लोकामधे जनजागृती करून कोरोना विषाणूबाबत माहिती पत्रक वाटुन तसेच संचारबंदी असल्यामुळे कोणी घराबाहेर पडू नये, चार पेक्षा जास्त लोकानी चौकामधे थांबू नये. ग्रामपंचायत सरपंच सीताराम भिल व त्याचे सर्व सहकारी उपसंरपच ग्रा प सदस्य हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत गावातील कुरखळी ग्रामसर्वांगीन विकास मंच च्या वतीने व गावातील तरुनांचा देखील चागला सहभाग आहे. बाहेरगावाहुन आलेल्या माणसाची लगेच माहिती दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रशी सपर्क करुन लगेच त्या माणसाला आरोग्य यंत्रणा घरी जाऊन तपासणी करुन नोंद केली जात आहे.

ग्रामपंचायत कुरखळी यांच्यावतीने गावात लवकरच फवारणी करण्यात येणार असून. अशीच काही दिवस शातंता ठेवत नागरिक घरी बसून राहिले तर कोरोनाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही.

लोकांनी संयम ठेवला तर पोलिस, आरोग्य यत्रंणा ग्रामपंचायतीला सहकार्य होईल व त्यांच्यावरील अतिरिक्त ताण कमी होईल. सुचनाचे पालन केले पाहिजे, तरीही लोकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. असा संदेश प्राथमिक आरोग्य केंद्र खर्दे गटाचे वैद्यकीय अधिकारी मनोज पाटील यांनी दिला. 

याप्रसंगी सरपंच सिताराम भिल, ग्रामसेवक बी एस चव्हाण, ग्रा. पं. सदस्य, अवधूत मोरे, डॉ. मनोज पाटील (वैद्यकीय अधिकारी), एस डी वाडीले(आरोग्य सहाय्यक), एस एस शेख (आरोग्य सेवक), एन बी चौधरी (आरोग्य सेवक), दीपक ईशी, पुरुषोत्तम शिरसाठ, पराग मोरे, पावबा कोळी, सचिन मोरे, आशा कर्मचारी, शिपाई, सुधाकर मोरे, पत्रकार योगेश्वर मोरे सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध