Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ मार्च, २०२०

आदिवासी बांधवांकडून जगभरात चाललेल्या कोरोना वायरची कुठलीही भीती न बाळगता होळी रंगपंचमी च्या शेवटच्या दिवसाच्या सण हजारोच्या संख्येने संपन्न


सत्रासेन:प्रतिनिधी:आदिवासी बांधवांकडून जगभरात चाललेल्या कोरोना वायरची कुठलीही भीती न बाळगता होळी रंगपंचमी च्या शेवटच्या दिवसाच्या सण हजारोच्या संख्येने संपन्न

महाराष्ट्रातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावांमध्ये तसेच मध्य प्रदेशातील वरला,बलवाडी महाराष्ट्रातील चोपडा तालुक्यातील वैजापूर,उमरटी व शिरपूर तालुक्यातील रोहिणी, सांगवी या गावांमध्ये आदिवासी बांधवांच्या भोंगर्‍या बाजार 3 मार्चपासून सुरू झाला होता.

आदिवासी बांधवांच्या दिवाळीसारखा ओळखला जाणारा सण म्हणजे भोंगर्‍या उत्सव 3 मार्च पासून सुरू झाला असून 14 मार्च शेवटचा दिवस होता.

शेवटच्या दिवसाच्या उत्सवाला आदिवासी बांधव मेवादला या नावाने ओळखतात उत्साहात होळीसाठी व भोंगर्‍या उत्सवासाठी तीन मार्च पासून शहराकडे कामासाठी गेलेले आदिवासी बांधव आपल्या वस्त्यांवर परततात आणि पाड्या-वस्त्या वरील गावांमधील आदिवासी बांधव भोंगर्‍या बाजार ज्या गावात राहतो त्याठिकाणी जाऊन आपला उत्साहात साजरा करत असतो.

आजच्या शेवटच्या दिवशी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव दिसून आले हा उत्सव आदिवासी नृत्य व वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम करून आपल्या रूढी परंपरेप्रमाणे संपन्न करण्यात आला. जगात चाललेल्या कोरोना वायरच्या थयमानाला न भिता न भीती बाळगता त्यांनी हा उत्साह मोठ्या आनंदाने साजरा केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध