Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७ (The Epidemic Diseases Act 1897) मधील कलम २ आजपासून लागू
संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७ (The Epidemic Diseases Act 1897) मधील कलम २ आजपासून लागू
राज्यात वाढत चाललेला करोना रोगाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आता सव्वाशे वर्षांपुर्वीचा ब्रिटिशांचा कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७ (The Epidemic Diseases Act 1897) मधील कलम २ आजपासून लागू करणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत जाहीर केले.
या कलमानुसार करोनाच्या संशयित रुग्णांना त्यांची इच्छा असो किंवा नसो तरिही सरकारने ठरविलेल्या ठिकाणीच उपचार घ्यावे लागणार आहेत. तसेच कलम २ (ब) नुसार संशयित रुग्णाला रेल्वे, बस अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतूनही प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत.
काय आहे कायद्याची पार्श्वभूमी
ब्रिटिशांनी ४ फेब्रुवारी १८९७ रोजी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७ (The Epidemic Diseases Act, 1897) मध्यवर्ती विधीमंडळात संमत केला होता.
या कायद्याला प्लेगचा निर्बंध कायदा म्हणूनही ओळखले जाते. या कायद्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांना रुग्णांना घरातून बाहेर काढण्याचे अधिकार दिले होते. त्यांच्या गैर वापराविरुद्ध न्यायालयात दाद मागायचीही त्या काळात सोय नव्हती.
कलम २ नुसार, जेव्हा एखादा संसर्गजन्य आजार हा धोक्याची पातळी ओलांडेल तेव्हा त्यावर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित राज्य सरकारला अतिरिक्त अधिकार मिळतील. या रोगाच्या रुग्णांना प्रतिबंधित करण्याचे अधिकार या कायद्याने सरकारला प्राप्त होतात. तसेच कलम २ (ब) नुसार संबंधित रुग्णाला हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवणे आणि प्रवास करण्यावर बंदी आणणे अशा उपायांचा देखील समावेश आहे.
तसेच कलम ३ नुसार, जर एखाद्या व्यक्तीने कलम २ मानन्यास विरोध केला तर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १८८ नुसार त्यावर कारवाई करण्याचा अधिकारही सरकारला प्राप्त होतो. मात्र कलम ३ लागू केले आहे का? याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
*हा कायदा कधी लागू केला होता*
संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा, १८९७ हा मागच्या शंभर वर्षात एकदाही वापरला गेला नव्हता. मात्र २००९ साली पुण्यातच हा कायदा पुन्हा लागू केला होता. स्वाईन फ्लू आजाराचा संसर्ग वाढल्यानंतर कलम २ लागू केले होते.
त्यानंतर २०१५ साली चंदिगढ येथे मलेरिया, डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आणि २०१८ साली वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया तालुक्यात कॉलराला आळा घालण्यासाठी या कायद्याची अमलबजावणी करण्यात आली होती.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर शिरपूर शहर पोलिसांनी आता ...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात...
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
बेटावद, ता. शिंदखेडा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राष्ट्रीय ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा