Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ मार्च, २०२०

रावेर येथील आठवडे बाजारातील नगरपालिकेच्या हद्दीत असलेले दुकानांचे अतिक्रमण काढण्यास गुरुवार पासून सुरवात झाली


रावेर:प्रतिनिधी:येथील आठवडे बाजारातील नगरपालिकेच्या हद्दीत असलेले दुकानांचे अतिक्रमण काढण्यास गुरुवार पासून सुरवात झाली आहे.दरम्यान ४ ते ५ दुकानांचे अतिक्रमण काढण्यात आले असून, अतिक्रमण धारकांनी विरोध केल्याने उर्वरित अतिक्रमण नंतर काढण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाकडून मिळाली आहे.  

येथील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत आठवडे बाजार,गुरांचा दवाखाना व पालिकेचे उद्यान यालगत असलेले सुमारे २० अतिक्रमणधारकांना पालिकेने नोटीस दिली होती.त्या नुसार आज सकाळी मुख्याधिकारी रवींद्र लांडे कार्यालयीन अधीक्षक सरफराज तडवी,बांधकाम अभियंता जावेद शेख,स्वच्छता निरीक्षक धोंडू वाणी,लिपिक दीपक देशमुख,रचना सहा.मयूर तोंडे,कर्मचारी रवी बागरे,गणेश रणशिंगे,चंदन बागरे,श्यामकांत काळे,आदी कर्मचार्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरवात केली.यावेळी रावेर पोलीस स्टेशन तर्फे बंदोबस्त लावण्यात आला होता.

काही अतिक्रमण धारकांनी विरोध केला,तर काही दुकान मालकांनी स्वत अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले.सदर भागातील व आठवडे बाजार परिसरात सुमारे २० जणांनी अतिक्रमण केलेले आहे.हे अतिक्रमण लवकर काढण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध