Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १४ मार्च, २०२०

सुभाष चौक ते तांबेपुरा रस्ता संध्याकाळी ७ वाजेनंतर अंधारमय.....



कामगार महिला बघिनिंची शहरातुन घरी येतांना होते जीवघेणी धावपळ...
नगर  परिषद त्या रस्त्यावर हायमास्ट पथदिवे बसऊन रस्ता प्रकाशमय करेल का ??
अमळनेर..विकास कामांच्या दृष्टीने तांबेपुरा परीसर तसा अडगडीत पडलेल्या फाईल सारखा गेल्या अनेक दशकांपासून धुडखात पडलेला असून लोकप्रतिनिधिंच्या उदासिनतेमुळे परिसरातिल नागरिकांना अनेक गैरसोईंना वर्षानुवर्षे तोंड द्यावे लागत आहे.

कृषीभुषण दादा त्यांच्या कल्पकतेला वाव देऊन आमचा तांबेपुरा परीसराचा विकासाभिमूख नावलौकि़क माननिय नगराध्यक्षा ताईसाहेब यांच्या माध्यमातून करतिल या भाबळ्या आपेक्षेने परिसरातिल मतदान भरभरून दिले .

अजूनसुद्धा ताईसाहेब कृषीभुषऩ दादांसोबत तांबेपुरा परिसरात येऊन आम्हाला विकासात्मक न्याय देतिल असे नागरिकांना वाटते. '' प्रशासनाचे लक्ष जेंव्हा पडेल तेंव्हा..

तुर्तास ..तांबेपुरा परिसराकडे येणाऱ्या रस्यावरील पथदिवे त्वरीत,जलदगतिने तथा तातडीने बसवावेत ही नागरीकांची प्रमुख ,प्राधान्यक्रमांकाची मागणी आहे .
 तांबेपुराकडे येणाऱ्या महीला बघिनींना तसेच प्रवाशांना राञी अंधाराचा व एकांताचा गैरफायदा घेऊन चोर,माथेफिरू,रेल्वेतुन ऊतरलेले वेडसर तसेच रोडरोमियोंकडून ञास होण्याची शऱक्यता असते .त्याअनुषंगाने पथदिवे बसविन्याची मागणी जोर धरू लागली आहे...



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध