Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ एप्रिल, २०२०

भोई समाज सुशिक्षित झाला परंतु सुरक्षित नाही... श्री अशोकमोरे, एरंडोल



एरंडोल प्रतिनिधी:माझ्या समाजाचा इतिहास पाहता असे वाटते की, भोईसमाज पूर्वी जितका एकसंघ होता तितका आता मात्र एकसंघ नाही. त्याची अनेक कारणे आहेत त्याचे त्यात विभक्त कुटुंबपध्दत ही आहे. पूर्वी नदी/नाला/तलावाच्या ठिकाणी जाऊन एकत्रित येऊन समूहाने राहत होते. कुटुंब प्रमुखांच्या निर्णयानुसार मासेमारी/डांगर वाडीची कामे होत होती. 

कालांतराने यात बदल होऊन काहींनी शिक्षणाच्या ध्यास घेऊन एकाच ठिकाणी आपला संसार थाटून/ मांडून तेथूनच तलाव/नदी/नाला येथे मासेमारी/डांगरवाडीची कामे करू लागली यातूनच काहीच्या मुलांनी शिक्षण घेऊन समाजाच्या नावावर (लाभ घेऊन) नोकऱ्या घेतल्या व काही समाज बांधवांनी आपले पारंपरीक व्यवसायात समाधान मानून जिथे होते तिथेच थांबले; परंतु जे शिकले सवरले त्यांनी फक्त आपले कुटुंब व जवळचे लोकांना नोकऱ्या/रोजगार उपलब्ध करून देण्यातच समाधान मानले. इतरांना मात्र याबाबत त्यांनी त्या काळात काही ही सहकार्य केले नाही ही खंत आताचे त्या काळातील जेष्ठ समाजबांधव करीत आहेत. 

आता काळ बदलला आहे बरेच गरीब समाजबांधव आपल्या मुला/मुलींना कष्ट करून शिकवत आहेत परंतू त्यांना रोजगार(नोकरी) मिळणे अशक्य आहे. त्यामुळे आजच्या बराच युवा वर्ग बेरोजगारीमुळे बेचैन झाला असून त्याचाच गैरफायदा घेत काही पक्षाचे पुढारी अश्या युवकांना व्यसनाधिनता बनवत असून आपल्याच समाजात तेढ निर्माण करण्याची कामे करीत करतात आहेत. 

           
तसेच काही ठिकाणी तर आपल्या माता/भगिनीवर अन्याय/ अत्याचार होतांना आपण बऱ्याच वेळेला ऐकतो परंतु आपल्यामध्ये दुहेरी, तिहेरी, गट, तट, आपल्याला त्याचे काय घेणे तो त्याचे बघेल किंवा मी माझे बघेल असे वागणे असल्यामुळे अशी अनेक प्रकरणे दाबली गेलीत किंवा दुर्लक्षित झाली असे म्हणता येईल. 
         
त्यामुळेच की काय माझा समाज सुशिक्षित झाला परंतु सुरक्षित नाहीअसे मला मला तरी वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध