Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

भिलाली येथे रेशन दुकानावर गर्दी करण्याच्या कारणावरून कोतवाल यांनी केला गुन्हा दाखल :


अमळनेर i प्रतिनिधी  – (शिवाजी पारधी ) कोरोनो व्हायरसच्या महामारीच्या  पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. त्यासाठी शासन स्तरावर प्रत्येक अधिकारी ,कर्मचारी यांना योग्य ते तोंडी व लेखी आदेश देण्यात आले आहेत .

देशाच्या शेवटचा पातळीवर कार्यरत असलेला ग्रामीण भागातील कर्मचारी यांनी देखील त्यांच्या हाताखाली काम करत असणाऱ्या कर्मचारी यांना जबाबदारी दिली आहे व त्या जबाबदारीचे पालन करणे हे  त्या तळागाळातील कर्मचाऱ्याचे कर्तव्यच आहे. या महामारीच्या संकट समयी मात्र काही गावांतील नागरिक हेतू पुरस्कर पालन करत नसल्याचे दिसून येत आहे. अशीच एक घटना भिलाली येथे घडली असून त्या अनुषंगाने तेथील कोतवाल सागर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या आधारे  आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत  चार जणावर  गुन्हा   दाखल केला

भिलाली येथील तलाठी यांच्या तोंडी आदेशानुसार  कोतवाल हे रेशन दुकानावर गर्दी होवू नये म्हणून थांबले होते .त्याठिकाणी लोकांनी तोंडाला मास्क ,रुमाल बांधावा व सुरुक्षित अंतर ठेवावे अश्या सुचना कोतवाल संभाजी पाटील करत होते . अश्यातच रेशन दुकानावर समाधान गिरासे यांनी विना मास्क बांधता गर्दी करून नियम मोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याला समजवले व तो मागे गेला  व परत पुढे आला व कोतवाल सागर पाटील यांनी त्याला पुन्हा समज दिली व तो घरी निघून गेला.
रेशन वाटप झाल्यावर संभाजी पाटील घरी आराम करत असतांना समाधान गिरासे यांचे मावसे हरसिंग,अजय,अमर व लालसिंग गिरासे हे  कोतवाल यांना घरी जावून शिवीगाळ करत  हाता बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध