Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ ऑगस्ट, २०२०

कोरोना रूग्ण दगावला असता अंत्यसंस्कार कोणी करावा म्हणुन दोन ते तीन तास विलंब , प्रशासनात समन्वयाचा अभाव!



जामनेर:प्रतिनिधी: तालुक्यातील टाकरखेडा येथील कोरोना बाधीत मरण पावलेल्या महीला रूग्णावर अंत्यसंस्कार कोणी करावे या गोंधळातच प्रशासनाचा तब्बल दोन ते तीन तासाच्या वर आज खोळंबा पहायला मिळाला.विशेष म्हणजे सदर कोरोना बाधीत ७० वर्षीय महीला रूणाचा मृत्यु सोमवार रात्री बारा वाजेच्या सुमारास झाला होता.

मयत रूग्णाच्या नातेवाईकांनी पालीका व उपजिल्हा रूग्णालयाकडे संपर्क केला असता अंत्यसंस्कार कोणी करावे यावरून टोलवा-टोलवी करीत असल्याचे दिसुन आले, या गंभीर प्रकाराने नातेवाईकांमधे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली.
येथील बोदवड रस्त्यावरील कोवीड सेंटरमधे पाच दिवसांपुर्वी सदर महीलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात बोदवड रस्त्यावरील या कोवीड सेंटर मधील दाखल रूग्णांनी मिळणाऱ्या अपुर्ण सोयी-सुवीधांबाबत सकाळपासुन तर दुपार पर्यंत चांगलाच गोंधळ केला.येथील वैद्यकीय सुवीधा,चहा,नास्ता,जेवणाबाबतही रूग्णांकडुन तक्रारी ऐकायला मिळाल्या.
मात्र इकडे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोरोना रूग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणी सर्व सोयी-सुवीधा चांगल्या दिल्या जात आहेत,यात कुठलाही भेदभाव करण्यात येत नाही.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध