Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३ डिसेंबर, २०२०

विधानपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं पुन्हा निष्पन्न..!



शिरपूर प्रतिनिधी: धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे (BJP) अमरीश पटेल (Amrish Patel) विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या (Congress) अभिजित पाटलांचा पराभव केला आहे. मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी असल्याचं पुन्हा निष्पन्न झालं आहे.

भाजपच्या अमरीश पटेल यांना ३३२, तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली आहेत. त्यामुळे अमरीश पटेल यांचा विजय झाला.काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसमधून (Congress) भाजपात आलेल्या अमरीश पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजित पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. दरम्यान,अमरीश पटेल विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यशस्वी झाले. भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ मतदारांनी मतदान केले होते.

काँग्रेसच्या किमान ५७ मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले असून, काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाली आहेत. आघाडीच्या किमान ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केले आहे तर ४ मते बाद झाली आहेत.महाविकास आघाडीची २१३ मते असतानाही पाटील यांना ९८ च मते मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध