Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गहू पिकांचे नुकसान...!



धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गहू हरभरा ज्वारी ही पिके वादळामुळे आडवी झाली असून यामुळे शेतकऱ्यांचा स्वप्न आता धुळीस मिळाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाले आहेत मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कडे लक्ष देत नव्या उमेदीने पेरण्या केल्या होत्या मात्र रब्बी हंगामातील पीक बहरले असतानाच या अवकाळी पावसामुळे उभी पिके उध्वस्त झाली आहेत. 

शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी कंचनपुर डोंगरगाव वालखेडा वाघाडी डोंगरगाव माळीच कलमाडी यासह परिसरात झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

धुळे शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसात 7.75 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून या अवकाळी पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहेत. कांद्यावर चरपा रोगाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना असल्याने हे नुकसान होऊ नये यासाठी शेतकर्‍यांवर पुन्हा एकदा फवारणीची वेळ आली आहे. 

दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध