Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

ब्रेकींग : ओबीसी आरक्षणाच्या सुधारीत अध्यादेशावर राज्यपाल कोशारींची स्वाक्षरी



मुंबई : आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारनं राज्यपालांकडे अध्यादेश पाठवला होता पण त्यात राज्यपालांनी काही त्रृटी काढल्या होत्या. त्यानतंर राज्य सरकारनं सुधारणा करीत सुधारीत अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला. त्यावर आता राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे.

 राज्यपालांनी ही फाईल आता राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे पाठवलीय.

अध्यादेशाचे होणार कायद्यात रूपांतर
ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारीत अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केल्यामुळे आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यादेशावर स्वाक्षरी केल्याबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे आभार मानले. राज्यपालांनी अध्यादेशातील काही त्रृटीआम्हाला सांगितल्या होत्या. त्यात आम्ही सुधारणा करून तो परत त्यांना पाठवला. आता या सुधारित अध्यादेशाला राज्यपालांनी मंजूर केलं, यासाठी आम्ही राज्यपालांचे आभारी असल्याचे भूजबळ म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध