Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २३ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
मुंबईत पार पडणार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन - अध्यक्ष महाराष्ट्र महिला आयोग सौ.रुपाली ताई चाकनकर
मुंबईत पार पडणार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन - अध्यक्ष महाराष्ट्र महिला आयोग सौ.रुपाली ताई चाकनकर
येत्या २५ जानेवारीला राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला २९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुबई मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील 'रंगस्वर सभागृहात' २९ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार शरद पवारसाहेब उपस्थित राहणार आहेत. यासोबत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती निलमताई गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबत श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सावंत-प्रभावळकर, श्रीमती विजया रहाटकर,श्रीमती सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. तसेच चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, या महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा