Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले.



एकदा एका माकडाला अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्याने झोपलेल्या सिंहाचे कान ओढले. 

सिंहाने उठून रागाने गर्जना केली की, हे धाडस कोणी केले ? 
स्वतःच्या मृत्यूला कुणी बोलावले ?

माकड : मी कान ओढले,महाराज, सध्या मित्र नसल्यामुळे मी खूप उदास आहे ; आणि मला मरण पाहिजे आहे,तुम्ही मला खाऊन टाका.

सिंहाने हसून विचारले :माझे कान ओढतांना,तुला कोणी पाहिले तर नाही ना? 
माकड : नाही महाराज.
सिंह : मग ठीक आहे,आणखी एक दोन वेळा कान खेच, खूप छान वाटतंय.

या कथेचे सार.....,
एकटा राहून जंगलाचा राजा ही कंटाळतो.  यावरून स्पष्ट होत की मैत्री ही हवीच..!!

म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा,त्यांचे कान ओढत रहा..!,म्हणजे चेष्टा मस्करी करीत रहा. मेसेज येणे भाग्याचे समजा,कोणीतरी आपली आठवण काढतंय..

वेगवेगळ्या विषयांवर चर्चा देवाणघेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो..कंटाळवाणे होऊ नका.वयाला विसरा,मजा करीत रहा.

संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.          विश्वास ठेवा की,तुमचे मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू शकूत..

मैत्री-श्रीमंत किंवा गरीब नसते,मैत्री शिकलेली वा अडाणी असावी असे काही नसते. कारण- मैत्री ही  केवळ मैत्रीच असते.!!.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध