Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ जुलै, २०२२

आशापुरी पतसंस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या सुमारे दीड कोटी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन संचालकांना अटक



अमळनेर ( प्रतिनिधी ) आशापुरी पतसंस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या सुमारे दीड कोटी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे.तर उर्वरित ९ संचालकांना अद्याप अटक झालेली नाही याबाबत अधिक माहिती अशी की,अमळनेर येथील आशापुरी पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी तक्रारी केल्या होत्या.

याबाबत सहकार विभागामार्फत लेखा परीक्षणात १ कोटी ५ ९ लाख ८७ हजार ४३२ रुपयांचा झाल्यावरून लेखापरिक्षक राजेश उत्तमराव पाटील यांनी पतसंस्थेच्या १५ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१ ९ मध्ये संचालकांना ५ ९ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते.मात्र संचालकांनी टाळाटाळ केली.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.तो पुन्हा अमळनेर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. 

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिसांच्या मदतीने यातील सचिन प्रभाकर कोठावदे,विजय मुरलीधर कोठावदे,रघुनाथ धोंडू कोठावदे यांना अटक केली आहे.१५ पैकी तीन संचालक मयत झाले आहेत तर तिघांना अटक झाल्याने उर्वरित ९ संचालकांना अद्याप अटक झालेली नाही. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध