Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

टायगर ग्रुप नंदुरबार जिल्हा पुन्हा एकदा गर्जू जनतेच्या सेवेत..!



नंदुरबार प्रतिनिधी:केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा निमित्ताने हर घर तिरंगा घर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे पण अशा लोकांसाठी काय,ज्यांच्याकडे घर नाही, ज्यांच्याकडे जेवणाचे साधन नाही,हा पण एक प्रश्न आहे.

या प्रश्नाचे उत्तर आणि समाधान बनून टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक मा.पै.जालिंदर दादा जाधव(वस्ताद) टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष मा.पै.तानाजीभाऊ जाधव,टायगर ग्रुप उत्तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा.पै.सागरभाऊ कांबळे,टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष पै.ऋषिकेश (बाबा) भांडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच टायगर ग्रुप नंदुरबार जिल्हा प्रमुख सदस्य पै.सोनूभाऊ माळी,मुजम्मिलभाऊ हुसैन,
जितूभाऊ भोई यांच्या उपस्तीतिथ टायगर ग्रुप नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने बेघर लोकांच्या झोपड्यांवर राष्ट्रध्वज लावणे बरोबर अन्नदान वाटपा चे कार्यक्रम15ऑगस्ट 2022 रोजी बेघर वस्ती या ठिकाणीं राबवण्यात आला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी,विशाल महाजन,रिक्की माळी,निलेश बॉस, अनिस शेख,रोहित सरोज,अर्जुन जाधव,दिपक सोनार,विशाल ठाकरे, अब्दुल रहीम,सागर पगारे,सोनू चौधरी, धीरज भोई,भटू गवळी,आतिश मराठे, गौरव राजपूत,निखिल जव्हेरी,दादू पाटील,जयेश पाटील,अमर हिरणवाळे, दानिश खान, उपस्तीत होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध