मागील काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीची चर्चा होती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काल याबाबत प्रतिक्रिया देत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याचं आवाहन केलं होतं. त्याचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपला पत्र देत लटके यांना बिनविरोध निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.
काल रात्रीपासून भाजप नेत्यांच्या बैठका पार पडल्यानंतर सकाळी भाजपने ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली आहे. दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही आपण पक्षाच्या आदेशानुसार माघार घेत असल्याचे सांगितले आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी ही अपेक्षा होती असं सांगत ऋतुजा लटके यांनी शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडानंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड होत असल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा