Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट , रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाची सूचना मी केली होती ; पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटी दौरा रद्द...!
अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट , रश्मी ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाची सूचना मी केली होती ; पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गुवाहाटी दौरा रद्द...!
उध्दव ठाकरे यांनी आधीच महाराष्ट्रभर दौरे केले असते तर आजची वेळ आली नसती.मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे अडीच वर्षांत केवळ चार वेळा मंत्रालयात गेले.तत्कालीन परिस्थितीत उध्दव ठाकरेंना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा हे सांगणारा मीच होतो,असा गौप्यस्फोट राज्याचे कृषीमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज केला.
अब्दुल सत्तार हे आज नाशिक दौर्यावर होते.त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.एकीकडे आज बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला कामाख्या देवी दर्शनाला रवाना झाले असतानाच कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र नाशिक दौर्यावर आले आहेत.
यासंदर्भात विचारणा केली असता सत्तार म्हणाले,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह आमदार गेलेत म्हणजे महाराष्ट्र दर्शनासाठी गेले असा अर्थ होतो.मी गुवाहाटीला गेलो नाही,कारण माझा कार्यक्रम पूर्वनियोजित होता.त्यामुळे कोणत्याही नाराजीचा प्रश्न येत नाही. औरंगाबादमध्ये देखील कृषी प्रदर्शन होणार असून त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील कृषी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी आलो आहे.त्याशिवाय नागपूरला नितीन गडकरी यांनी भरविलेल्या प्रदर्शनालाही भेट देणार असल्याचे ते म्हणाले.सत्तार म्हणाले,
आज परिस्थिती बदलली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार लोकांचे आहे.त्यामुळे मुख्यमंत्री अनेक भागात भेटी देत आहेत तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हे आता रस्त्यावर उतरत आहेत.उद्धव ठाकरे यांनी आधीच असे दौरे केले असते तर ही वेळ आली नसती.महाविकास आघाडी सरकारच्या काळात फक्त चार वेळात मंत्रालयात गेले.मी त्याचवेळी म्हणालो होतो की, उद्धव ठाकरे यांना जमत नसेल तर रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवा.मात्र त्यासाठी शरद पवार,सोनिया गांधी यांची अनुमती आवश्यक होती.मी छोटा कार्यकर्ता असल्याने काही केले नाही,असेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सिन्नर येथील दौर्यावर सत्तार म्हणाले, मुख्यमंत्री ईशान्यश्वेर मंदिरात दर्शनासाठी आले होते,हात दाखविण्यासाठी नाही.तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत,यात कोण कोणाला हात दाखवेल ते कळेल,अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर अनेक दिवसांपासून खोळंबलेल्या मंत्री मंडळावर म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्या संदर्भातील यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसह आमदार गुवाहाटी दौर्यावर गेले आहेत, मात्र अनेकजण टीका करत आहेत.अजित पवार यांनी देखील गुवाहाटी दौर्यावर तोंडसुख घेतले आहे.अजित पवार यांनीही बारामतीचा एखादा रेडा घेऊन गुवाहाटीला जायला पाहिजे,अशी सणसणीत चपराक सत्तार यांनी लगावली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा