Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ डिसेंबर, २०२२
Home
/
Unlabelled
/
५० सरपंच व २५६ सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद साक्री तालुक्यातील १६७ मतदान केंद्र सज्ज, ७ पथक राखीव
५० सरपंच व २५६ सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद साक्री तालुक्यातील १६७ मतदान केंद्र सज्ज, ७ पथक राखीव
साक्री तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पाच ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. १६७ केंद्रे मतदान प्रक्रियेसाठी सज्ज केली आहेत.निवडणूक कर्मचाऱ्यांची ७ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. ५० सरपंच व २५६ सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.साक्री तालुक्यातील ५० गावातील सरपंचांची जनतेतून थेट निवड होणार आहे. यासाठी मुख्यत्त्वे कासारे,धाडणे,भाडणे,वसमार व डेगाव या काही मोजक्या गावाच्या निवडणुकीतील चुरस खूप वाढली आहे. पाच सरपंच व २१५ सदस्य आधीच बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सरपंच पदाच्या ५० जागांसाठी एकूण १७९ उमेदवार तर २५६ सदस्य पदासाठी ५३७ उमेदवार रिंगणात आहेत.प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी तसेच एक शिपाई व एक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड नियुक्त केले आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची चुरस पाहता काही संवेदनशील गावांमध्ये साक्री, पिंपळनेर व निजामपूर पोलीस ठाण्याचे फिरते गस्त पथक नियुक्त केले आहे. सकाळी ७:३० ते ५:३० वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानंतर मतदान यंत्र सील करून साक्री तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रुममध्ये ठेवली जाणार आहेत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा