Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलिसांनी का थांबवला लग्न सोहळा ? तालुक्यातील करवंद गावात होणार होता.....विवाह
शिरपूर शहर पोलिसांनी का थांबवला लग्न सोहळा ? तालुक्यातील करवंद गावात होणार होता.....विवाह
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावात मंगळवारी होत असलेला बालविवाह विवाहाच्या काही तासाअगोदर शिरपुर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी नवरदेव नवरीच्या आई-वडिलांना समज देत समुपदेशन करून बालविवाह रोखला आहे.
शिंदखेडा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपुर तालुक्यातील करवंद येथील मुलाशी मंगळवारी 18 एप्रिल 2023 रोजी दुपारी करवंद गावात होणार होता.नियोजित विवाहातील नववधू ही अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी पथक तैनात करून पोहेकॉ अनिल जाधव,पोना पंकज पाटील,पोकॉ विवेक जाधव, महिला पोलीस पूजा सारसर आदींनी घटनास्थळी दाखल होत चौकशी करून वधू अल्पवयीन असल्याचे निदर्शनात येताच नातेवाईकांना समज देत वधू व वरास शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी बालविवाह विषयक कायदे, आरोग्य आणि बालविवाहचे दुष्परिणाम आदींबाबत माहिती देत समुपदेशन केले.वधू व वर आणि त्यांच्या आईवडिलांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे लेखीपत्र लिहून देत सदर नियोजित विवाह थांबविला.त्यामुळे नागरिकांच्या सतर्कतेने होणार बाल विवाह रोखण्यास शहर पोलिसांना यश आले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा