Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
आज मालेगाव बंद ! बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा निर्णय...!
आज मालेगाव बंद ! बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांचा निर्णय...!
मालेगाव प्रतिनिधी : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेधार्थ आज (दि.२०) मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.श्री क्षेत्र स्मशान मारोती मंदिर येथे झालेल्या सर्वपक्षीय तसेच सर्व सामाजिक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बांगलादेशमध्ये झालेला हिंदूंवरील हल्ला हा फक्त हिंदू धर्मियांवरील हल्ला नसून, हा हल्ला सगळ्या भारतीयांवरील आहे.बांगलादेशमध्ये झालेले बंड हे मोठ्या आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे.हिंदुस्थानचे मित्र शासक असलेल्या शेख हसीना यांची भारताशी असलेली सलगी, भारत धार्जिणे धोरण आवडत नसल्यानेच बांगलादेशमध्ये असलेल्या कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देऊन हे बंड घडून आणले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्याविरोधात भारत एकजुटीने उभा आहे, असे दिसले पाहिजे त्यामुळे सगळ्या संघटनांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी केले.
हिंदुस्थानचे मित्र शासक असलेल्या शेख हसीना यांची भारताशी असलेली सलगी, भारत धार्जिणे धोरण आवडत नसल्यानेच बांगलादेशमध्ये असलेल्या कट्टरपंथीयांना प्रोत्साहन देऊन हे बंड घडून आणले गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
बैठकीला सुरेश निकम, डॉ. तुषार शेवाळे, संजय दुसाने, नीलेश कचवे, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, किशोर इंगळे, नितीन पोफळे, जगदीश गोऱ्हे, प्रमोद पाटील, मुकेश परदेशी, दिलीप शेवाळे, जितेंद्र अहिरराव, मदन गायकवाड, राजेंद्र सूर्यवंशी, दुर्गेश कोते आदी उपस्थित होते.
‘बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण करू’- महंमद युनूस पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरून भाषण करताना, बांगलादेश सरकारने तेथील हिंदूंची काळजी घ्यावी, असे आवाहन केले होते. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकार पदच्युत झाल्यानंतर युनूस यांनी बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागारपद स्वीकारले आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोदी आणि युनूस यांच्यात प्रथमच संवाद झाला. मोदींनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी युनूस यांच्याशी बोलताना लोकशाही, स्थिर, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशला भारताचे समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला. ‘प्रा. महंमद युनूस यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. आम्ही प्रचलित परिस्थितीवर विचारविनिमय केला. त्यांनी बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली’, असे मोदी यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा