Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ जून, २०२५

एकाच दिवशी दोघांची गळफास घेऊन आत्महत्या



अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.


खापरखेडा येथे एका 45 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 रोजी घडली. सुरेश देवाजी भिल असे मयत इसमाचे नाव असून त्याने आपल्या गावी राहत्या घरी घराच्या छताला गळफास घेतला.सदर घटना लागलीच निदर्शनास आल्याने त्यास बेशुद्ध अवस्थेत खाजगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामिण रुग्णालयात आणण्यात आले.येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मयताच्या पश्यात पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.याबाबत अनिल सोनवणे यांनी मारवड पोलिसात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो हे कॉ.संजय सूर्यवंशी हे करीत आहेत.

शहरातील पैलाड भागातील लालचंद नारायण येशी वय ५५ यांनी स्वतःच्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली.

मयताचा पुतण्या कल्पेश राजेंद्र येशी याने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध