Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५
पाच वर्षीय निरागस मुलाचा खुन
जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील बाबूजीपुरा परिसरात घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. ईदच्या दिवशी हरवलेला पाच वर्षांचा निरागस मोहम्मद हन्नान खान मजीद खान याचा खून करून त्याचा मृतदेह जाळण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. या घटनेने परिसरातील वातावरण चिघळले असून संतप्त नागरिकांनी आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली आहे.
बालक बेपत्ता, नंतर मृतदेह सापडला
शुक्रवारी ईद-ए-मिलादच्या दिवशी संध्याकाळपासून मोहम्मद हन्नान बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असतानाच शनिवारी सकाळी आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिला (२२) याच्या वडिलांनी स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन मुलाने खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
घरात मृतदेह जाळून पोत्यात लपवला
आरोपी शेख शाहिद याने हन्नानचा खून करून त्याचा मृतदेह घरातच जाळला आणि पोत्यात लपवून ठेवला होता. आश्चर्य म्हणजे, तो पोलिस आणि पीडित कुटुंबीयांसोबत मुलाला शोधत असल्याचे नाटक करीत होता. अखेर पोलिस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.
शहरात तणावपूर्ण वातावरण
घटनेची माहिती पसरताच परिसरात मोठी गर्दी जमली. संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानावर दगडफेक केली. पोलिसांनी तातडीने खबरदारीचे उपाय केले असून व्यापाऱ्यांनीही स्वतःहून दुकाने बंद ठेवली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्वधर्मीय मोर्चा निषेधार्थ
या अमानवी कृत्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयापासून पोलिस ठाण्यापर्यंत सर्वधर्मीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातून प्रशासनाला निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी होणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर प्रतिनिधी :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाज...
-
तरुणी बेपत्ता शेतातून अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचा संशय अमळनेर तालुक्यातील कळंबु येथे शेतात कामासाठी गेलेली १५ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा