Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २०२५
Home
/
/
प्रभाग क्रमांक १२ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास!! बीजेपी उमेदवार मीराबाई कोळी व दिपक (पप्पू) माळी यांची ठाम ग्वाही
प्रभाग क्रमांक १२ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास!! बीजेपी उमेदवार मीराबाई कोळी व दिपक (पप्पू) माळी यांची ठाम ग्वाही
शिरपूर – आगामी नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ साठी भाजपच्या उमेदवार मीराबाई नामदेव कोळी व दिपक महादु (पप्पू) माळी यांनी विकास हा एकमेव अजेंडा ठेवत दमदार भूमिका मांडली आहे. “प्रभागातील प्रत्येक नागरिकाला सुविधा, स्वच्छता, रस्ते, निचरा व मूलभूत विकासाची सोय मिळाल्याशिवाय समाधान नाही. सत्ता आली तर कामच बोलू देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
नागरिकांशी संवाद साधताना दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित कामांच्या जलद निकालीसाठी ‘शून्य राजकारण—शंभर टक्के विकास’ हा मंत्र जाहीर केला. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अंगणवाडी-सुविधा, प्रकाशव्यवस्था, अंतर्गत रस्ते व कचरा व्यवस्थापन या सर्व क्षेत्रांत निर्णायक बदल घडवून आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघात सध्या प्रचाराचा जोर वाढत असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भाजप उमेदवारांची विकासाभिमुख भूमिका चर्चेत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - वरवाडे नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत युवा नेतृत्वाचा चे...
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा