Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ मार्च, २०२६

शिरपूर बाजार समिती ५ दिवस बंद; शेतकऱ्यांना शेतीमाल न आणण्याचे आवाहन



शिरपूर प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरपूर येथील कामकाज दि. १८ मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत बाजार समितीमध्ये कोणताही शेतीमालाची खरेदी-विक्री होणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी या कालावधीत आपला शेतीमाल बाजार समितीत आणू नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक व सचिव यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध