Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नसल्याने १ मे रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर चिमठाणे येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. ….



चिमठाणे परिसर -प्रतिनिध -- प्रविण भोई ...
केंद्र सरकारची पी.एम.किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना मानली जाते. मात्र चिमठाणे येथील काही शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे चित्र दिसून येत आहे. सदर शेतकरी ज्या दिवसापासून या योजनेचा प्रारंभ झाला त्या दिवसापासून कागदपत्राची पूर्तता करत आहेत. तहसील कार्यालयापासून तर कृषी विभागापर्यंत टाचा झिजवून सर्व ऑनलाइन प्रक्रिया पार पाडून वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारून देखील लाभ मिळत नसल्याने शेवटी त्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबीला आहे ..हे कृषिप्रधान देशाचे आताचे चित्र आहे.. कृषीप्रधान देशात जगाच्या पोशिंद्याला शेतीचे काम सोडून आमरण उपोषणाला बसावे लागते यापेक्षा मोठे दुर्दैव शेतकऱ्याचे नाही...श्रीमती मथुराबाई भलचंद्र गुरव, श्रीमती भिकूबाई शांताराम पाटील, श्री छोटू रामराव गागरे. हे सन्मान निधीपासून वंचित शेतकऱ्यांची नावे आहेत.सदर शेतकरी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त शिंदखेडा तहसील कार्यालयच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार आहेत......



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध