Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ एप्रिल, २०२६

कॉलनी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा ठार शेतकऱ्यांची पिंजरा लावण्याची मागणी.



बापू चव्हाण दिंडोरी

दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा (कॉलनी) येथे आज दि.१८ एप्रिल रोजी येथील शेतकरी वैभव गायकवाड यांच्या राहत्या घराजवळील डाळिंबाच्या भागात बिबट्याने पहाटेच्या सुमारास त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ठार केले.त्यामुळे या परिसरात पुन्हा शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
       
काही दिवसांपूर्वीच कॉलनी परिसरात राहणारे येथील शेतकरी चंद्रकांत सोनवणे यांच्या गाईवर हल्ला करून बिबट्याने गाईला ठार केले होते.त्याचीच प्रचिती पुन्हा येथील नागरिकांना शेतकऱ्यांना पहावयास मिळाले आहे.गाईला ठार करतातच पंचनामा करून वनविभागाने या ठिकाणी पिंजरा देखील लावला होता मात्र एक महिना उलटूनही या पिंजऱ्यात बिबट्या येत नसल्याने चार दिवसापूर्वीच कॉलनी परिसरातील पिंजरा वन विभागाने काढून निला.त्यानंतर आज पुन्हा या बिबट्याने या परिसरात येऊन एका कुत्र्याला ठार केले त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात असून सध्या या परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.तरी संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी येथील कॉलनी परिसरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे.
याआधीही या परिसरात वन विभागाला बिबटे पकडण्यात यश आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध