Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ३१ मे, २०२०

जागृती फाउंडेशनच्या वतीने, गीतांच्या माध्यमातुन कोरोना प्रबोधन...!



परंडा (राहूल शिंदे) दि.31 तालुक्यातील चिंचपुर (बु) येथील जागृती  फाऊंडेशन गीताच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य गीतकार,गायक,वादक सिध्दार्थ सावंत करत आहेत. काळ कोणताही असो विविध विषयांवर प्रबोधन करणे हा त्यांचा जन्मजात पिंडच आहे. 

त्यांचे वडिल नवनाथ सावंत हे सुध्दा शाहिर होते. त्यांच्या पासून लहान पनापासुन बाळ कडू मिळत गेल्याने त्यांनी आपल्या जीवनामध्ये सरकारच्या संकट काळामध्ये "पाणी" या विषयावर जागृतीचे मोठे काम केले आहे. त्त्यांनी "पाण्यानं पेटलेली आग" हे लोकनाटक लिहुण तत्काळामध्ये गावकुसात पाण्याविषयी जागृतीचे काम केले आहे. आपली कला शाहिरी बान्यातुन सामान्यांपर्यंत पोहचविली.

याच बरोबर व्यसनाधिनता आणि शेतकरी व शेतमजुर या विषयावर ही जागृतीचे काम केले आहे. अतिशय सर्वसामान्य जीवन जगणारा हा सावंत परिवार नेहमीच प्रबोधनाच्या वाटेवर अविरतपणे कार्यरत आहे.

वडिलांचाच वसा घेवुन सिध्दार्थ सावंत नावाचा कलाकार समाजातील विविध विषयांवर स्वता:हा गाणी लिहुन गाऊन जागृतीची ज्योत तेवत ठेवत आहेत. सरकारच्या विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमामध्ये सुध्दा जसे, व्यसनाधिनता,
दारूबंदी, लोकसंख्या नियंञन, महिला व बाल विकास, जल व स्वच्छताचे विविध उपक्रम, आरोग्य विभागाचे विविध उपक्रम, महिला सक्षमीकरण अशा अनेक उपक्रमामध्ये गेली वीस वर्षापासुन कार्यरत आहे. आजच्या कोरोणा विषाणुपासुन होणार्‍या साथीच्या आजारावर सर्वसामान्य जनतेला आपल्या गीतांच्या माध्यमातुन समजावुन सांगत आहे. 

सिध्दार्थ सावंत यांची जागृती फाऊंडेशन ही संस्था आपल्या कलाकारांना सोबत अगदी विनामुल्य सगळ्यांना समजेल अशा शब्दांमध्ये गीताच्या माध्यमातुन समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम करून आपल्या राज्याच्या सरकारला मदतीचा हात देत आहे. जागृती फाऊंडेशनच्या वतीने त्यांनी आपल्या जागृत्ती जथ्याला सोबत घेवुन सोशल मिडियाच्या माध्यमातुन  तसेच कोरोना जनजागृती गीताच्या माध्यमातून अहमदनगर व उस्मानाबाद आकशवाणी केद्रावर देखील प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्याची मिळालेल्या संधीमुळे लोकांपर्यंत पोहचता आले.

आज प्रत्येक जन राज्याच्या सरकारला ऐन-केन प्रकारे मदत करतआहे. यात सिध्दार्थ सावंत यांची जागृती फाऊंडेशन सुध्दा मागे नाही. आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवित असताना समाज आणि सरकारच्या आपत्तीकालीन कार्य काळात या ना त्या माध्यमातुन सरकार  करत असलेल्या उपाय-योजना गाव स्तरातील सर्व सामान्यांपर्यंत गीतातुन पोहचविण्याचे काम करत आहेत. खरं पाहता यालाच माणुसपण आणि माणुसकी म्हणतात. आपल्या शब्दाच्या माध्यमातुन भयभीत असलेल्या, मानसिक दबावाखाली असलेल्या व मिडियाच्या बेक्रिंग न्युज देण्याच्या आक्राळ-विक्राळ पध्दतीमुळं सातत्याने ब्रेन हॅमरेज होवुन मानसिक दृष्टया खचत असलेल्या मानवी मनाला आपल्या शाहिरी बान्यातुन कोरोना पासुन आपला बचाव कसा करावा.  हे सांगुन लोकांना मानसिक आधार देण्याचे अनमोल असे कार्य जागृती फाऊंडेशनचा कलामंच करत आहे.

सध्या लाॅकडाऊन असल्यामुळं मानवी समाज मनाला आधार देण्यासाठी सोशल मिडियाच्या फेसबुक, व्हॅटसअप, युट्युब या माध्यमांचा वापर करत सिध्दार्थ सावंत हे कोरोना संबंधी जन-जागृती करण्याचे काम करत आहेत. आजच्या या कठीन परिस्थितीमध्ये अगदी विनामुल्य मनोरंजनातुन, प्रबोधन करणार्‍या, सरकारच्या भुमिकांना  गाण्यांच्या माध्यमातुन जनतेत पोहचविणार्‍या  कलापथकाच्या सर्व कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली पाहिजे. कोरोनाच्या संबंधी जाणिव-जागृती करत असताना सरकार, आरोग्य यंञना, पोलिस प्रशासन, नगर पालिका, महानगर पालिका आणि जे लोक कोरोनापासुन सर्वसामान्य जनतेला वाचविण्यास अहोराञ झटत आहेत. अशांना गीतांच्या माध्यमातुन त्यांचा संदेश पोहचविण्याचे काम सिध्दार्थ सावंत आणि सह कलावंत करत आहेत. ही अतिशय कौतुकास पाञ बाब आहे. प्रबोधनाच्या या उपक्रमात  कलापथकामध्ये योगदान देणारे, सिध्दार्थ सावंत यांच्यासह, पुत्र आनंद सावंत,  सुनिल बनसोडे, भिमाई बनसोडे, बुवासाहेब साठे  लक्ष्मण लोहार, राम लोहार, सागर बनसोडे ही सर्व मंडळी "सामाजिक अंतर" हा नियम पाळत आपल्या छोठ्या गावातील लहानश्या वस्तीतुन आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातुन "वर्क फ्राॅम होम" करत सर्वसामन्य जनतेमध्ये कोरोना विषाणुतुन येणार्‍या साथीच्या आजाराविषयी जन-जागृती करत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध