Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यात अती पावसामुळे सर्व शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून दुष्काळाच्या निकषाची मदत मिळणे बाबतची मागणी
जळगाव जिल्ह्यात अती पावसामुळे सर्व शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून दुष्काळाच्या निकषाची मदत मिळणे बाबतची मागणी
जळगाव जिल्ह्यात अती पावसामुळे सर्व शेती पिके नष्ट झाल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करून दुष्काळाच्या निकषाची मदत मिळणे बाबतची मागणी निवेदनाद्वारे सोपान पाटील यांनी केली
जळगाव जिल्ह्यात रावेर यावल मुक्ताईनगर चोपडा तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्याने सर्व पिक परीस्थिती उत्तम होती.अगोदर उडीद मुग चवळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातची गेली नंतर थोडा
पाऊस थांबल्याने दिलासा मिळाला.ज्वारी कापूस मका सोयाबीन कापणीच्या तयारीत असतानाच परत सतत धार परतीचा पाऊस सुरू झाला हाती तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला ज्वारी कापनीवर होती कापुस वेचणीवर होता पाऊस थांबवण्याची शेतकरी प्रतिक्षा करीत होता परतिचा पाऊस नथांबता अनेक दिवस सुरूच राहील्याने ज्वारीच्या उभ्या व कापलेल्या ज्वारीस अकुंर कोंब फुटले त्याच प्रमाने मका, कपासी,सोयाबीन,भुईमूग सर्वच पिकाची स्थिती निर्माण झाली आहे तसेच सतत तपमानात घट राहील्याने केळीवर सुध्दा रोग पडल्याने अनेकांनी महागडी केळीची टिशुची रोप लावुन केळी जगवली होती ती रोग पडल्यामुळे वअळी पडल्याने केळी उपडून नष्ट करावी लागली शेतकऱ्यांची आनंदात जाणारी दिवाळी अतीशय चिंतेत गेली पुर्ण हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आज आर्थिक अडचणीत सापडलेला आहे अनेक वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्ती बोंडअळी,लाल्या,करपा, दुष्काळ ,गारपिट, अतिवृष्टी या अनेक कारणांमुळे आज शेतकरी थकलेल्या आवस्थेत आहे शेतकरी कर्जाचा डोंगराखाली दबलेला आहे त्यातच यावर्षी नविन संकट ओला दुष्काळ पडला आसल्याने शेतकरी सरकारकडे मोठ्या आपेक्षा बाळगून आहे त्यासाठी शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतकऱ्यांना पंचनाम्याचे नाटक न करता व वेळ काढु धोरण न राबवता सरसकट शेतकऱ्यांचे सर्वच पिकांचे नुकसान झालेले आसल्याने शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी व दुष्काळाचे निकष लावून भरीव पकेजची घोषणा
करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी,लाईट बिल माफ करावे,कर्जवसुलीस स्थगिती द्यावी,नविन रब्बीचा हंगाम उभा करण्यासाठी रोखीची मदत द्यावी यासह दुष्काळाचे सर्व निकष लावून भरीव मदत देवुन दिलासा द्यावा ही आग्रहाची विनंती याप्रकारची मागणीचे निवेदन
सोपान बाबुराव पाटील जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी किसान सभा जळगाव यांनी जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांना दिले त्यांच्या प्रती
मुख्यमंत्री,कृषीमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री,
मुख्यसचीव मंत्रालय,
सचिव कृषी,
सचीव मदत पुनर्वसन,
जिल्हाधिकारी ,जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव. यांना
निवेंदन दिले त्यावेळी संजय चव्हाण जिल्हा कार्यालयीन सचीव रमेश पाटील माजी जि प सदस्य रामधन पाटील किसान सभा तालुकाध्यक्ष एरंडोल ईत्यादी हजर होते
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा