Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

वादळी पाऊसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसानभरपाई मिळावी - जि.प विरोधी पक्षनेते शरण पाटील...!



उस्मानाबाद (राहूल शिंदे)दि. 11 : मागील 2-4दिवसात  वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,  नुकसान भरपाई मिळावी, 

त्याचबरोबर हाता-तोंडाशी आलेल्या  खरीप पिके असलेल्या सोयाबीन, मूग, उडीद आदीं पिकांचेही खूप नुकसान झाल्याने त्याचीही नुकसान भरपाई मिळावी, याबाबत आज शुकवारी झालेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव पाठविण्याची मागणी जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील  यांनी केली. 

त्यानंतर यासंदर्भात रीतसर ठराव शासनास आजच्या सर्वसाधारण सभेत पाठविण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध