Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ जून, २०२०

व्यथा एका जवानाची...!




निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल रहिवाशी
स्व.सुधाकर गंजी सोनवणे यांचा
जन्म ता.१५/१२/१९५० साली स्व.द्रुपताबाई व स्व.गंजी नागो सोनवणे यांच्या पोटी धनगर कुटूंबात झाला. त्या वेळेस घरची परिस्थिती जेमतेम होती. सर्व कुटुंब घरच्या शेतात काम करायचे सुधाकर सोनवणे यांना दोन लहान भाऊ व तीन बहिनी आई वडिल असे कुटुंब होते. 

त्यांच्या अंगी जीद्द खुप होती. व्यायाम करण्याचा त्यांना खुप छंद होता. वडीलांना नाटक सादर करण्याचा खुप छंद होता. ते रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज व थोर पुरूषांच्या शुरविरतेच्या कथा सांगत ते ऐकून सुधाकर सोनवणे यांच्या अंगात देशभक्ती जळली व देशसेवा करण्याची त्यांनी मनाशी गाठ बांधली. 

वयाच्या १८ व्या वर्षी दि.१३/०६/१९६८ साली जळगाव येथून भारतीय सैन्यात त्यांची भर्ती झाली. लखनऊ येथे ट्रेनिंग घेऊन ते ए.एम.सी मध्ये जाँईन झाले. १९७१ साली दोन महिन्या च्या दिवाळीच्या सुटीवर आले असता अचानक तार आली  तात्काळ सिमेवर बोलावणे झाले. 

दिवाळीची सुटी आणि घरातील शेव लाडू अजून बाकी होते पण सर्व त्याग करूण देश सेवेसाठी जावे लागले. ०३ डिसेंबर १९७१ रोजी रात्री पाकिस्तान ने भारतावर हल्ला केला. छम जोडिया सेक्टर मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी युध्द लढतांना अनेक दुष्मणांना धरातर्थी पाडले. जब देश मे थी दिवाली ओ खेल रहेथे होली जब हम बैठेथे घरोंमे ओ झेल रहेथे गोली...१९९७ मध्ये आलेले बाँर्डर चित्रपट या युध्दावर आधारीत आहे. युध्द लढत असतांना सुधाकर सोनवणे यांना डाव्या पायाला व डाव्या खांद्याला मार लागून ते भयंकर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ चंडिगळ हाँस्पीटलला हलवण्यात आले. तत्कालीन प्रधानमंत्री स्व.इंदिरा गांधी यांनी त्यावेळी प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली होती. १३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी भारताने पाकीस्तान वर विजय मिळवून भारतीय सेनेने त्यांचे ९३००० सैनिक पकडले होते. १५ डिसेंबर त्यांचा वाढदिवस पण १६ डिसेंबर लाच ते मनवत असत कारण १६ डिसेंबर हा १९७१ चा विजयी दिवस तो त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या शौर्याचा विजयी दिवस आहे. 

चंडिगड येथिल दवाखान्यातून बरे झाल्यावर घरी परत आले तेंव्हा सर्व निंभोरा वासी सह परिसरातून सत्कार समारंभ करण्यात आला. त्या वेळेस ते रावेर तालुक्यात एकमेव युध्द जखमी सैनिक होते. तत्कालीन मंत्री स्व.मधुकरराव चौधरी, प्रतिभाताई पाटील, जिल्हाधिकारी आर.एल.प्रदिप यांनी निंभोरा येथे घरी येऊन जवान सुधाकर सोनवणे यांचे अभिनंदन केले होते. निंभोरा येथिल ग्रामपंचायत, सोसायटी, शाळा, स्कूल, केळी ग्रुप व विविध संस्थांनी व प्रतिष्टीत नागरीकांनी व निंभोरा सह परिसरातील सर्व नागरीकांनी सत्कार समारंभ करून संपूर्ण गावभर विजयी मिरवणूक काढली होती. तत्कालीन कलेक्टर आर.एल.प्रदिप सर यांच्या अध्यक्षतेखाली स्व.गिरधरशेठ सखाराम भंगाळे यांच्या हस्ते दि.२८/०१/१९७२ रोजी भव्य सत्कार सोहळा निंभोरा येथे पार पडला होता. महाराष्ट्र शासनाकळून तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक, जिंल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हाधिकारी आर.एल.प्रदिप सर यांनी जळगाव येथिल पोलिस ग्राउंडवर सत्कार समारंभ करूण त्यांच्या शौर्याचा गौरव करूण ०३ हेंक्टर ७२ आर शेत जमीन बक्षीस दिली. या वेळे मोठ्या प्रमाणावर अधिकारी मान्यवर व जळगाव सह परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणावर हजर होते.
                  *राज्यजिल्हाधिकारी साहेबांनी घरासाठी जागा देण्याचे आदेश ही निंभोरा ग्रामपंचायतीला दिले पण दुर्दैवाने आज पर्यंतही त्यांना निंभोरा ग्रामपंचायतीने त्यांच्या शौर्यासाठी जाहीर झालेली घरासाठी बक्षीस जागा दिली नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. त्यांच्या  त्या प्रशासनाला जाग येऊन  जाहीर झालेली त्यांची बक्षीस जागा मिळेल काय हा सवाल पुढे येत आहे. आज पर्यंत निंभोरा ग्रामपंचायतीने जागा अर्ज करूण, तोंडी सांगून, वेळो वेळी ग्रामसभांन मध्ये सांगून, ठराव करून सुंध्दा बक्षीस जागा निंभोरा ग्रामपंचायतीने दिलेली नाही ही मोठी खेदाची बाब. देशासाठी ज्यांनी प्राण पणाला लावले स्वतः अंगावर गोळ्या झेलल्या त्यांची जाणीव प्रशासन व निंभोरा वासीयांना कधी येईल त्यांची बक्षीस जागा सुध्दा निंभोरा ग्रामपंचायत आज पर्यंत देऊ शकली नाही, हि खेदाची बाब आहे. गाव करील ते राव काय करील असे म्हणतात पण गाव सैनिकाची बाजू घेऊन न्याय करील काय...?*
त्या नंतर त्यांनी पुणे व विविध ठीकाणी कर्तव्य दक्ष सेवा बजावली. घरी आल्या नंतर त्यांनी वरणगाव फँक्टरी, भुसावळ फँक्टरी येथे सिक्युरीटी मध्ये सेवा बजावली. 
त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमा सह नाटकांचा फार शोक होता लहान भाऊ स्व.श्रावण सोनवणे व श्री.शालिग्राम सोनवणे सह इतर भावंडांना सोबत घेऊन त्यांनी जय जवान नाट्यमंडळ स्थापण करूण त्यांची व्यथा एका जवानाची, डाकू मानसिंग ही सर्वांत गाजलेली नाटके असे विविध नाटके त्यांनी निंभोरा गावात सादर केली. विविध स्कूल काँलेज मध्ये त्यांनी सर्जीकल स्ट्राईक, कारगिल विजयी दिवस, सोळा डिसेंबर विजयी दिवस आदि विषयांनवर खरा सैनिक तरूणांनसमोर उभा केला. 
सुधाकर सोनवणे हे स्वाभीमानी होते कोणत्याही कार्यक्रमात ते पत्र कींवा निमंत्रण पत्रिका शीवाय जात नसत. त्यांना सैनिक होण्याचा खुप अभिमान होता. असहाय्य व होतकरूंची मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत व युवकांना सैन्यात जाण्यासाठी उदार मनाने मार्गदर्शन करत असत. त्यांचा शेवटचा वाढदिवस त्यांनी भुसावळ मिलीटरी स्टेशन मध्ये माजी सैनिक मेळाव्या प्रसंगी साहेबांन सोबत मनवला त्या दिवशी ते खुप उत्साही व खुष होते. शेवटचा कार्यक्रम व सत्कार समारंभ निंभोरा नाभिक समाजातील वधूवर परिचय मेळाव्यात २५ डिसेंबर २०१९ ला झाला.
अशा या शुरविर सैनिकाची प्राणज्योत अल्पशः आजाराणे २१ मे २०२० वयाच्या ७० व्या वर्षी गुरूवार रोजी सकाळी ०९:३० वाजेला त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी नर्मदा सोनवणे, भाऊ श्री.शालीग्राम सोनवणे, सौ.लिला सोनवणे मुलगा दिलीप सोनवणे, मुलीगी आशा सोनवणे, उषा सावळे,  निशा पवार, प्रियंका सोनवणे, रामकृष्णा सोनवणे असा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध