Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी आपली फळे,भाजीपाला बागांची ऑनलाईन प्रणालीवर नोंदवही करावी...!
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी आपली फळे,भाजीपाला बागांची ऑनलाईन प्रणालीवर नोंदवही करावी...!
उस्मानाबाद(राहूल शिंदे),दि.16 महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असुन राज्यात मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आलेली आहे. विशेषतः द्राक्ष,डाळींब,आंबा,संत्री या फळपिकांची व विविध भाजीपाला पिकांची व्यावसायीक दृष्टीकोणातुन लागवड करुन नवनविन तंत्रज्ञानाचा वापर करुन निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन करण्यात येत आहे.
जागतीक बाजारपेठेतील ग्राहकांनबरोबर स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांमध्ये आरोग्याच्या सुरक्षतेबाबत विशेषता किडकनाशक उर्वरित अंशाबाबत जागरुक्ता निर्माण झालेली आहे.
राज्यातील जास्तीत जास्त फळे व भाजीपाला पिकांचे उत्पादन करुन युरोपीयन व इतर देशांना केले जाते. युरोपीयनदेशांना किडनाशक उरर्वत अंश मुक्तीची हमी अट घातल्याने सन-2004-05 पासुन राज्यात अपेडाच्या मार्गदर्शनाखाली ग्रेपनेट या ऑनलाईन कार्याप्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्षबागांची ऑनलाईन नोंदणी करण्यांची कार्यवाही करण्यात येते.
सन2020-21या वर्षीकरीता नोंदणीची कार्यवाही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांचे कार्यालया मार्फत करण्यात येत आहे.
ग्रेपनेटच्या यशस्वी अंमलबजावणी लक्षात घेऊन आंब्याकरिता मॅगोनेट,डांळीबा करिता अनारनेट,भाजीपाला पिकाकरिता व्हेजनेट व संत्रा मोसंबी लिंबु करीता सिट्ररसनेट या पिकांचे ऑनलाईन नोंदणीकरीता अपेडाच्या साईटवर सुविधा उपलध करुन देण्यात आलेले आहे. सदरच्या सुविधाचा वापर करुन जास्तीत जास्त फळे व भजीपाला पिकांची नोंदणी करण्याकरिता ऑनलाईन निर्यातक्षम बागाची नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
किटकनाशकाच्या अतिवापरामुळे आरोग्याच्या सुरक्षिततेबरोबर सुरक्षित अन्न पिकाची अंमलबजावणी करणेबाबत केंद्र शासनाने सुचित केलेले आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेत ग्राहकांना किटकनाशक उर्वरीत अंशाची हमी देण्याकरीता भारतीय अन्न सुरक्षा मानक प्राधिकरनाने अधिकतम उर्वरित अंश मर्यादा MRL निर्धारित केलेल्या आहेत.
सन 2020-21 मध्ये निर्यातक्षम बागांचे नोंदणी करण्याकरिता व बागांची तपासणी करण्याकरिता प्रत्येक तालुक्यातील सर्व कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक कृषि अधिकारी यांनी तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहेत.
निर्यातक्षम बांगांची नोंदणी करण्याचा कालावधी निर्धारीत करण्यात आला आहे.त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.
ट्रेसीबीलीटीनेट,ऑनलाईन नोंदणीचा कालावधी:-
द्राक्ष-ग्रेपनेट, नोव्हेंबर 2020 ते जानेवारी 2021, आंबा मॅगोनेट डिसेंबर 2020 ते मार्च 2021 डाळींब-अनारनेट वर्षाभर सुरु आहे. भाजीपाला व्हेजनेट वर्षाभर सुरु आहे. लिंबुवर्गीय फळपिके-सिट्रसनेट वर्षाभर सुरु आहे. बिलवाईननेट वर्षाभर सुरु आहे.
जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या फळे व भाजीपाला बागांची ऑनलाईन प्रणालीवर नोंदणी करुन घ्यावी.असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
विश्वमराठासंघ धाराशिव यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन...!
भूम (राहूल शिंदे) दि.16 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व मराठा संघ धाराशिव यांच्या वतीने राज्य व केंद्र सरकारचा निषेध करीत
पावसाळी अधिवेशनात मराठा समाजासाठी आरक्षणा बाबत योग्य तरतूद करावी. मराठा आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सेवा व सवलती उपलब्ध करून द्याव्यात,
यासाठी विश्व मराठा संघ धाराशिव यांच्यावतीने आज उपजिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन देण्यात आले.
मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलत, सारथी साठी 1000 कोटींचा निधी,बेरोजगार भत्ता यासह मराठा समाजासाठी कल्याणकारी योजना यासारख्या अनेक मागण्या ह्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.मनिषा राशिनकर (उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी ) उपविभाग भूम यांनानिवेदन देण्यात आले.
यावेळी सोमनाथ कोकाटे जिल्हाध्यक्ष, अजित तांबे युवक जिल्हाध्यक्ष, उमेश जाधव युवक जिल्हाकार्याध्यक्ष,अँड.योगेश पाटील जिल्हा कायदेशीर सल्लागार
व युवक तालुका कार्येअध्यक्ष भूम कृष्णा घिमरुड उपस्थित होते.
जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर दीड टक्केपर्यंत खाली आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात -पालकमंत्री शंकरराव गडाख..!
उस्मानाबाद(राहूल शिंदे) दि.16 जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे.
उस्मानाबाद जिल्हा व महाराष्ट्र राज्याचा सध्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यू दर समान असून उस्मानाबाद जिल्ह्याचा हा मृत्युदर दीड टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी प्रशासनाने अधिक तत्परतेने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकराव गडाख यांनी दिले.
कोरोना संदर्भात येथील सर्कीट हाऊस मध्ये बुधवारी (दि.16) सायंकाळी पालकमंत्री गडाख यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे,आ. सुजितसिंह ठाकूर, आ. राणा पाटील, आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर , निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डि.के.पाटील, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रकाश खापर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगांवे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, ऑक्टोबर अखेरपर्यंत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे संकेत मिळत असल्याच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबवून कोरोनाचा प्रतिबंध करावा . सध्या जिल्ह्यात राज्या एवढाच मृत्यूदर(2.87%) आहे. तर हा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर दीड टक्क्यापर्यंत खाली येण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अती गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. ते नियंत्रणात आले पाहिजे. जिल्ह्यात 60 वर्ष वयावरील 141 रुग्णांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोविड-19 च्या चाचण्या वाढवल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाच ते सात गावे हॉटस्पॉट आहेत. हॉटस्पॉट असलेल्या गावातील सर्व लोकांची चाचणी करण्याचेही निर्देश आ.गडाख यांनी दिले. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सध्या तीन औषधांची गरज असून त्यासाठी साडेसहा कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णासाठी ऑक्सिन, व्हेंटीलेटरची उपलब्धता करुन देण्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकाडून प्रमाणपत्र दिल्यास संबंधीत रुग्णास होम क्वारंटाईन करण्यात येत आहे.
शहरी भागातही होम आयसोलेशनची सुविधा देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्ह्यात साधारणपणे 48 ते 50 गावे हॉटस्पॉट असून त्यात उस्मानाबाद शहरासह तेरखेडा, उमरगा, तुळजापूरचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच अॅलन्टीजेन चाचणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून परंडा, भूम, मध्ये चांगले कॉन्टक्ट ट्रेसिंग होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने बैठकीत दिली.
पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरणार- आ.अनिल देशमुख...!
मुंबई,प्रतिनिधी दि.16 पोलीस शिपाई संवर्गातील 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येत आहेत. यासंदर्भात वित्त विभागाच्या 4 मे 2020 च्या शासन निर्णयातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मा.सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्गाच्या आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे मंत्रिमंडळाने गृह विभागाला निर्देशित केले आहे.
पोलीस शिपाई संवर्गातील 2019 या वर्षामधील 5297 पदे तसेच 2020 या वर्षामधील 6726 पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित 975 पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील 505 अशी एकूण 12 हजार 528 पदे 100 टक्के भरण्यात येतील.
सौ.वंदना भगत यांची आरोग्यदूत पदी नियुक्ती....!
उस्मानाबाद(राहुल शिंदे) दि.16 लोहारा येथील सौ.वंदना प्रकाश भगत यांची विश्व जन आरोग्य सेवा समिती मार्फत ''लोहारा तालुका आरोग्य दूत'' पदावर संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत,सचिव श्री.प्रशांतदादा भोसले, प्रदेश सल्लागार श्री.निलेशदादा साठे, प्रदेश संपर्क प्रमुख श्री.रविंद्रदादा पाटील यांनी सौ.वंदना भगत यांच्या सामजिक कार्याची दखल घेऊन निवड केली आहे व तसे नियुक्तीपत्र दिलेले आहे.
आपण विश्व जन आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून रुग्णसेवेचा वसा आणि वारसा समितीचे नियम आणि सर्व बंधने पाळून चांगल्या प्रकारे मानवतेचे कार्य करून रुग्णांचा आधार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या निवडीबद्दल विश्व जन आरोग्य सेवा समितीचे धाराशिव (उस्मानाबाद)जिल्हा समन्वयक श्री.सोमनाथदादा कोकाटे व परंडा तालुका आरोग्यदूत श्री.राहुल शिंदे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठवाडा मुक्तिदीनी 'एकच संकल्प सव्वाशे करोड. . . .! या जि.प.प्रा.शा.देऊळगाव उपक्रमांतर्गत परंडा तालुक्यातील जि.प.शाळांना वह्या वाटप...!
परंडा (राहूल शिंदे) दि.17 मराठवाडा दिनानिमित्त तालुक्यातील प्रत्येक जि.प शाळेत वर्गशिक्षकांनी आँनलाईन अथवा आँफलाईन निंबध स्पर्धचे आयोजन करावे व त्यातील निवडक सहा निंबध निवडून प्रत्येक विद्यार्थांला एक वही वाटप करण्यात यावीअसे आवाहन सचिन सुर्यवंशी मुख्याध्यापक जि.प.प्रा.शा. देऊळगाव केंद्र-डोंजा यांनी केले. एक हजार वह्या तालुक्यात वाटप करण्यात आल्या .
यासाठी जगदाळे मँडम गटशिक्षणाधिकारी,दत्ताञय कदम विस्तार अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब घोगरे केंद्रिय मुख्याध्यापक, भागवत घोगरे, प्रकाश ठवरे पदविधर शिक्षक , विश्वास गायकवाड मुख्याध्यापक,सुब्राव सुरवसे,नामदेव निलंगे, प्रशांत गोकुळे, अनंत वाघमोडे,संतोष बैरागी, देवकर सर, राहुल अंधारे यांनी नियोजन केलेे.
निबंधाचे विषय कोरोना काळात माझी जबाबदारी, माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा, माझ्या स्वप्नातील आदर्श खेडेगाव, निसर्ग माझा मिञ असे होते .त्यानुसार प्रत्येक जि प शाळेला 1ते 5वी अर्धा डझन वह्या तर 1ते 8साठी एक डझन वह्या वाटप करण्यात आल्या.
देऊळगाव येथे विस्तार अधिकारी दत्ताञय कदम, सरपंच रंजना माने,केशव गाढव,विराज सुर्यवंशी, आलम सय्यद सह सर्व शिक्षक उपस्थित होते.अक्षय पाटील इ सातवी प्रतिनिधि स्वरुपात वही देऊन सत्कार केला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा