Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ सप्टेंबर, २०२०

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करा- प्रहार शिक्षक संघटना...!




उस्मानाबाद (राहूल शिंदे )दि.१५ 
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे सीईओ ट्रांन्सफर लाॅगिनला १० ऑगस्ट २०२० रोजी याद्या प्राप्त झाल्या परंतू महिना उलटून गेला तरी बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती धनंजय सावंत,शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांना समक्ष भेटून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेसाठी सकारात्मक चर्चा केली,लवकरच कार्यमुक्त केले जाईल असे प्रहार संघटनेला आश्वासित केले.

निवेदनात म्हटले आहे की,आंतरजिल्हा बदली यादीतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणेस्तव जा.क्र.जिपउ/शि/आस्था-८ कावि-८०२/२०२०अन्वये जिल्हा कार्यालयास कागदपत्रे दि.१७ ऑगस्ट २०२० पर्यंत जमा करावित असे शिक्षकांना संदर्भित पत्रकानुसार कळवले होते,

ऑनलाईन बदली झालेले शिक्षक मराठी/उर्दू माध्यम यांनी आवश्यक कागदपत्रे जमाही केली परंतू अद्याप संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही.

सन २०१७ ते २०२० या कालावधी मधील एकूण ४ टप्प्यामध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ह्या बिंदुला बिंदु याप्रमाणे झालेल्या आहेत त्यामुळे बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करावे याबाबत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांचे दिनांक २६ ऑगस्ट २०२० चे पत्रही सीईओ यांचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे,विलास थिटे,शांतीराम बागूल,शेषेराव गायकवाड,गजानन इंगळे,शरद पवार आदि.शिक्षक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध