Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

भुमिपुत्र अनिल पाटील यांना दहिवद येथे आर्थिक मदतीचा हाथ .

BY ऑनलाईन तरुण गर्जना
१४ ऑक्टोबर २०१९
शिवाजी पारधी (प्रतिनिधी )

चोपडा येथील माजी आमदार कैलास पाटील याच्या विजयाची पुनरावृत्ती अमळनेर तालुक्यात होणार .सत्ताधारी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याने भुमिपुत्राच्या पाठीमागे खंभीर उभे रहा .जाती-पातीचे विष पसरविणाऱ्या नेत्यांना घरचा रस्ता दाखवा  ....
चिमणराव पाटील (शेतकरी संघटना )  

अमळनेर तालुका एकजूट होत भुमिपुत्राच्या मागे खंभीर पणे उभा राहत असल्याचे चित्र गावां-गावांत  आहे. तालुक्यातील हे परिवर्तन पक्षासाठी नसून अमळनेरच्या स्वाभिमानासाठी असल्याची चर्चा जनतेत आहे. भारतीय जनता पार्टीची कितीही लाट असली व यांनी कितीही Evm सेट  केले तरी या निवडणुकीत अमळनेरची जनता रेकॉर्ड ब्रेक मतदानाने भुमिपुत्राला विजयी  करतील .



दहिवद येथील अनिल पाटील यांच्या प्रचार सभेत गावांतील सर्व जाती धर्माच्या लोकानी सहभाग घेत  मोठ्या उत्साहात घरो –घरी आरती करून  आर्थिक मदत दिली .शेतकरी संघटनेचे चिमणराव पाटील यांनी दादांना आशिर्वाद दिलेत व जनतेला भुमिपुत्राच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान देखिल केले.


प्रचार सभा संपल्यावर शिवाजी महाराज चौकात  राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल पाटील यांनी जनतेशी  संवाद साधत भावनिक हाक  घातली  ,



मी आणि माझ्या बाजूने सर्वसामान्य कार्यकर्ते लढतायत. सर्वसामान्यांच्या जीवावर माझी लढाई आहे.
तालुक्यातील प्रत्येक माणूस जो स्वत:ला एकटा समजतो, योग्य विचार करतो, लढण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, तो प्रत्येक जण माझा लढवय्या कार्यकर्ता आहे, तोच नैतिकतेचं निशाण अमळनेरवर फडकावणार आहे.
घड्याळातली योग्य वेळ  आता जनतेला  समजली आहे.अमळनेर शहर आणि तालुक्याला नैतिकतेचं एक फार मोठं वलंय आहे. यात शांतता प्रिय साने गुरूजी आणि शिक्षणाचा पाया रचणारे श्रीमंत प्रतापशेठजींचा आपण वारसा विसरूच शकत नाहीत. येथील व्यापारी, शेतमजूर, शेतकरी, सर्व जाती धर्मातील लोक गुण्यागोविंदाने राहात होते पण इथे जातीचे विष पाच वर्षापुर्वी चौधरी बंधूनी अमळनेरच्या मातीत रुजवल त्याचे परिणाम आज डोळ्यासमोर आहेत.
सर्वांची एकमेकांशी मैत्री रहावी  एक जीवाभावाचं नातं असाव . ते अखंड राहिलं पाहिजे. विचारांची देवाण घेवाण अशीच सुरू राहिली पाहिजे.'आमचं अमळनेर' असं सांगायला त्यांना आवडेल आणि अमळनेर तालुक्याची किर्ती लोक ' वासून' ऐकतील असं अमळनेर लोकांना अपेक्षित आहे.


भयभयीत करणारं वातावरण कुणालाच नको आहे.
'मनी आणि मसल' पावर दाखवून, पायाखाली सर्वांना दाबून टाकू, सर्वांना आपल्यामागे फिरायला भाग पाडू, पडद्यामागून अवैध धंद्यांना ऊत आणू, अशी घातक विचारसरणी अमळनेरकरांना पचली नाही, पचणार नाही. म्हणून अशा लोकांचं मूळ या पुण्यभूमीवर उगवणार देखील नाही.दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्याने, शेतमजुराने पाठीवर हात ठेवला आणि पाठिंबा दिला तोच आता माझ्यासाठी मोठा आधार आहे. माझ्यामागे तालुक्यातील 'बडे नेते' कुणीच नाहीत, हे खरं आहे. माझा 'बडा घर पोकळ वासा' होणार नाही हे ही स्पष्ट आहे.

पण सर्वसामान्य कष्टकऱ्यांची मोठी ताकद आज वाट पाहतेय. सर्वसामान्यांचा आतला आवाज मला न्याय देणार आहे.
आपण  मला मतदानाच्या दिवशी न्याय द्याल . घड्याळ चिन्हाच्या समोरचं बटण दाबून वाईट शक्तींना सणसणीत वाजवाल अशी अपेक्षा नाहीतर विश्वास आहे .






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध